Tuesday, March 29, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

परीक्षेतला आहार

परीक्षेचा कालावधी मुलांच्या मेंदूकरिता मॅरेथॉनसारखा असतो. त्यांच्या मेंदूला मॅरेथॉनमध्ये टिकून राहायचे असेल तर मुलांना चांगले पोषण मिळणे अत्यावश्यक आहे. पोषक खाद्य आणि पेये यांच्या सेवनाने मानसिक क्षमता आणि मेंदूची सतर्कता वाढण्यात मदत होते.

परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या काळात मुलांवर प्रचंड मानसिक ताण असतो. या काळात मुलांची फार लवकर मानसिक दमणूक होत असल्याचे चित्र दिसतं. या ताणामुळे मुलं नीट खात नाहीत किंवा ताण विसरण्याकरिता खूप खातात. अभ्यास करताना झोप येऊ नये याकरिता भरपूर चहा-कॉफी घेतली जाते. परीक्षेच्या आधीचा आणि परीक्षेचा कालावधी म्हणजे मुलांच्या मेंदूकरिता एखाद्या मॅरेथॉनसारखा असतो.

त्यांच्या मेंदूला या मॅरेथॉनमध्ये टिकून राहायचे असेल आणि प्रचंड स्पध्रेच्या या युगात मुलांना तगून राहायचे असेल तर मुलांना चांगले पोषण मिळणे अत्यावश्यक आहे. पोषक खाद्य आणि पेये यांच्या सेवनाने मानसिक क्षमता आणि मेंदूची सतर्कता वाढण्यात मदत होते. या काळात मुलांनी जंक फूड खाल्ले तर त्यांना अधिक दमल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटेल. तुमच्या मेंदूला सतर्क आणि तरतरीत ठेवायचे असेल तर तुम्ही योग्य आहार घेणे आवश्यक असते.

आरोग्यदायी खाण्यामुळे मेंदूच्या कामगिरीत सुधारणा होते हे सत्य असले तरी या प्रक्रियेला खूप वेळ लागतो व ती अनेक बाबींवर अवलंबून असते. खाली दिलेल्या टिप्समुळे तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता वृद्धिंगत करता येईल, शिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीतही सुधारणा करता येईल. तुमची प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीविना सहज चांगला आणि मन लावून अभ्यास करू शकाल.

नियमित अंतराने थोडे थोडे खा

जेवण, विशेषत: न्याहारी तर मुळीच चुकवू नका. परीक्षेदरम्यान तासन् तास बसायचे असल्याने आणि शारीरिक हालचालींच्या अभावी पोटाच्या समस्या उद्भवत असल्याने व त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये खंड उत्पन्न होऊ शकत असल्याने थोडेसे आणि सहज पचेल असेच खाणे खावे. भरपूर खाल्ल्याने किंवा पचण्यास जड पदार्थ खाण्याने झोप येऊ शकते.

योग्य स्नॅक्स आणि पेयांची निवड करा

उशिरापर्यंतचा अभ्यास, अपुरी झोप आणि ताण यांच्यामुळे शरीरातील अ‍ॅसिडची पातळी वाढते व त्यामुळे डोकेदुखी, तर कधीकधी उलटय़ा होऊन ताप येण्याचे प्रकार घडतात. हे टाळायचे असेल तर पुरेशी विश्रांती घेणे आणि पचायला सोपा असा आहार घेणे अत्यावश्यक असते. तुम्ही तात्पुरता जाग आणणारी चहा, कॉफीसारखी पेये टाळा, कारण तुम्ही झोप येऊ नये म्हणून कपमागून कप पीत राहाल आणि शरीरातील अ‍ॅसिडिटी तितक्याच प्रमाणात वाढत जाईल. अ‍ॅसिडच्या निर्मितीस कारणीभूत ठरणा-या चहा-कॉफीऐवजी तुम्ही नारळाचे पाणी, लस्सी, ताक, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घेणे इष्ट राहील. तऱ्हेतऱ्हेचे स्नॅक्स खाण्यापेक्षा फळं खा, अ‍ॅसिडिटीला नियंत्रणाखाली ठेवायचं असेल तर फळं खाण्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही. िलबूवर्गीय फळं देखील आम्लारी धर्मी असल्याने फळं खाताना हात आखडता ठेवू नका. फळांमधून शरीराला ऊर्जा देणारी व्हिटॅमिन्स, मिनिरल्स आणि फ्रुक्टोज मिळतात. स्ट्रॉबेरी, जांभळी द्राक्षे अशा काही फळांमध्ये रेसवेराट्रोल असते. रेसवेराट्रोल तुमच्या दीर्घ आणि अल्पकालीन स्मरणशक्तीमध्ये सुधारणा करण्यात मदत करते.

आहारात प्रथिनांचा समावेश करा

आपला मेंदू प्रथिनांपासून बनला आहे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्याने तुमच्या शरीराला ऊर्जेचा सतत पुरवठा होत राहातो व त्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही हे आपण पाहिले. दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, दाणे, द्विदल धान्ये, डाळी, दूध इ.चे नियमित तत्त्वावर सेवन केल्याने शरीरात टायरोसिन नावाचे अमायनो अ‍ॅसिड तयार होते. टायरोसिन रसायनांच्या माध्यमातून चेता पेशींना संदेश पाठवत राहाते आणि त्यामुळे मेंदूवर ताण असतानाही मेंदू सतर्क व जागृत राहतो.

स्मरणशक्ती वाढवणारा आहार

मासे, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, तीळ, सूर्यफुलांच्या बिया यांमध्ये ओमेगा ३-६-९ ही चरबीयुक्त आम्लं असतात. ही आम्लं मेंदूच्या विकासाकरिता आणि स्मरणशक्ती वाढवण्याकरिता उत्तम ठरतात.

लोहयुक्त आहार घ्या

मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल, त्याचे लक्ष लागत नसेल किंवा त्याला सतत झोप येत असेल, मुलाचे डोळे निळी झाक असलेल्या पांढरट बुब्बुळांचे असतील किंवा त्याची त्वचा फिकुटलेली असेल तर त्याच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, असे समजावे. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणं दिसून आल्यास त्याला पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्या, लिव्हर, हलिम / आळिव, सुके अंजीर, जर्दाळू, दाणे, बीन्स, खजूर असे लोह-युक्त खाणे द्यावे.

फळे व भाज्या मनसोक्त खाव्यात

फळे आणि भाज्यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी, ए, बी१, बी५, पँटोथेनिक अ‍ॅसिड, झिंक, मॅग्नेशियम अशी सूक्ष्म पोषणमूल्ये मिळत असतात. ही पोषणमूल्ये अँटीअ‍ॅक्सिडण्ट्सारखी कामे करतात आणि ऑक्सिडीकरणाने होणारे शरीराचे नुकसान टाळतात. व्हिटॅमिन्स अ‍ॅड्रेनलाईन या संप्रेरकाच्या निर्मितीकरिता आणि या संप्रेरकाची काय्रे उत्तम चालण्याकरिता उपकारक ठरतात. अ‍ॅड्रेनलाईन हे संप्रेरक ताणाशी मुकाबला करणारे आणि मन शांत ठेवणारे संप्रेरक आहे. व्हिटॅमिन एने समृद्ध असलेल्या ब्रोकोली, पालक, गाजर, टोमॅटो अशा भाज्यांच्या सेवनामुळे मेंदूमधील पेशींचे नुकसान कमी होते.

भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण राखणे अत्यावश्यक असते. अनेक वेळा असं होतं की, मुले एखाद्या खोलीतील थंडाव्यात किंवा एसी असलेल्या खोलीत बसल्याने त्यांना तहान लागत नाही, पण दिवसाच्या अखेरीपर्यंत त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीर व मेंदू दोघांनाही थकवा येतो, मरगळ, कधी कधी मळमळ जाणवते, गोंधळल्यासारखे होते. दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे आणि त्याच्या जोडीला लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक इ.देखील घेत राहिले पाहिजे.

बाहेरचे / चरबीयुक्त खाणे / जंक फूड टाळा

स्वच्छतेच्या कारणास्तव मुलांनी रस्त्याच्या कडेला विकले जाणारे आणि बाहेरचे खाणे टाळावे. पिझ्झा, बर्गर या पदार्थामध्ये प्रचंड प्रमाणात कबरेदके आणि चरबी असते, त्यामुळे झोप येऊ शकते. असे खाणे टाळलेलेच बरे!

शारीरिक हालचाल / व्यायाम

अर्धा ते एक तास उठून चालल्या-फिरल्याने तुमचा मूडही सुधारतो आणि मेंदूही तरतरीत होतो. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर अभ्यासादरम्यान एखादा खेळ खेळण्याकरिता किंवा चालण्याकरिता वेळ काढाच!

Read More »

पौष्टिक सोयाबीन

तेल आणि प्रथिने असलेलं हे फार जुनं पीक आहे. सोयाबीन हे वर्षायु झुडुप असून त्याच्या वेलीला आधार लागतो. झुपक्यांनी काळपट शेंगा लागतात. आतील बिया गोलसर, पिवळय़ा, हिरवट, तपकिरी किंवा काळय़ा रंगांच्या असतात. सोया हे नाव चिनी प्रदेशातून आले आहे.

तेल आणि प्रथिने असलेलं हे फार जुनं पीक आहे. सोयाबीन हे वर्षायु झुडुप असून त्याच्या वेलीला आधार लागतो. झुपक्यांनी काळपट शेंगा लागतात. आतील बिया गोलसर, पिवळय़ा, हिरवट, तपकिरी किंवा काळय़ा रंगांच्या असतात. सोया हे नाव चिनी प्रदेशातून आले आहे. मध्य आशियातील लोक मृतांना सोयाबीनचे दाणे व मध अर्पण करीत असत.

उत्तम प्रथिनांमुळे सिंधू खो-यात ऋषिमुनी शाकाहारी जेवणात सोयाबीनचा वापर करायचे. हे मूळचे चीनमधील पीक असून चीन, मंच्युरिया, कोरिया येथे प्राचीन काळापासून हे पीक उपलब्ध आहे. ख्रिस्तपूर्व १८३८ पासून त्यांचा चिनी साहित्यात उल्लेख आढळतो.

आज जगभर हे पीक लोकप्रिय असून अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, रशिया, ऑस्ट्रेलिया येथे त्याचं विशेष पीक घेतलं जातं. हल्ली ब्राझील, मेक्सिको, रुमानिया, अर्जेटिना व भारतातही सोयाबीनचं पीक घेतलं जातं. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व इतर अन्नघटक मुबलक आहेत. सोयाबीनमधील प्रथिनक ही संपूर्ण असून त्यात आवश्यक ती अमिनो अ‍ॅसिडस् असतात. माणसाच्या शरीरबांधणीस आवश्यक ते सारे घटक सोयाबीनमध्ये मिळतात. सोयाबीनमध्ये दूध, अंडी व मांस यांच्याहून अधिक प्रथिने आहेत.

»  याच्या सेवनामुळे शरीर मांसल बनते, कांती सुधारते.

» शरीराची वाढ कार्यक्षमतेने होते. तसेच मलावरोध होत नाहीत.

»  सोयाबीनचे दूधही अनेक आजारांवर उपयोगी होते.

»  लहान मुलांना सोयाबीनचं दूध देताना गाईच्या दुधात मिसळून द्यावे. यामध्ये ९० टक्के प्रथिने शरीरात सोडली जातात व संपूर्ण दूध पचवले जाते.

»  अपचन, वयोपरत्वे येणारा थकवा, मंदपणा यावर हे उत्तम आहे.

»  सोयाबीनमधला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लेसिथिन. याचा एक थर आतडय़ावर आतून येत असल्यामुळे अल्सर होत नाही.

»  अवयवांत साठणारे कोलेस्ट्रोल व मेद काढून इतरत्र नेण्याचे काम सोयाबीन करते.

»  सोयाबीनमध्ये पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पिष्टमय पदार्थामुळे उष्णता व उत्साह निर्माण होतो आणि मूत्रात जाणारे साखरेचे प्रमाण कमी होते.

»  मधुमेह असलेल्या व्यक्तींना सोयाबीन खूप उपयोगी आहे.

»  सोयाबीनमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने ते रक्ताक्षयावरही उपयोगी आहे.

»  सोयाबीनचे दूध, दही, पीठ, दाणे, तेल यांचाही वापर होतो. पाश्चात्य राष्ट्रांत सोयापिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

»  सोयाबीनचे पीठ, गव्हाच्या पिठापेक्षा अधिक पौष्टिक मानले जाते. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, थायमिन, रिबोफ्लेविन असते.

»  त्वचेच्या व्याधींवर सोयाबीन अतिशय गुणकारी आहे.

»  मांस, अंडी, दूध यातील प्रथिनांच्या अनावश्यक वापराला यामुळे पायबंद बसतो.

»  शरीराच्या पाचक एंझाइम ट्रिप्सीम याच्या कार्याला सोयाबीनमुळे अटकाव होतो. सोयाबीन भाजून घेतल्यास हा अटकाव होत नाही.

Read More »

निरोगी राहा

'देही आरोग्य नांदते, भाग्य नाही यापरते..' असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. कारण कोणालाही कुठलाही आजार न होणं म्हणजे त्या व्यक्तिसाठी हे चांगलंच असतं. 

'देही आरोग्य नांदते, भाग्य नाही यापरते..' असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. कारण कोणालाही कुठलाही आजार न होणं म्हणजे त्या व्यक्तिसाठी हे चांगलंच असतं. अशी व्यक्ती ही आजच्या जमान्यात भाग्यदायीच म्हटली पाहिजे. कारण आपण पाहतो सध्य कित्येक लहान-मोठी मंडळी कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतो. आपल्याला काही होउ नये म्हणून आपण आपली काळजी घेतो. मात्र शरीराच्या बाह्य स्वच्छतेबरोबरच शरीराची अंतर्गत स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते. ही अंतर्गत स्वच्छता केली तरच आपण निरोगी राहू शकतो.

»  यकृतामधून दररोज नको असलेले द्रव्य बाहेर पडत असतात. मात्र पदार्थावाटे शरीरात साचणारी नको असलेली द्रव्यही बाहेर फेकणं गरजेचं असतं. म्हणून असा आहार घ्या जो यकृताला त्याचं कार्य सुरळीत करायला मदत करेल. जेणेकरून तुमची पाचनक्रिया सुधारेल. अँटिऑक्सिडंट पदार्थाचा समावेश करा.

»  भरपूर प्रथिनं असलेले पदार्थाचं सेवन करा. त्यातील अमिनो अ‍ॅसिडमुळे शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर पडतात.

»  वाफवलेल्या भाज्यांचं सेवन करा.

» थोडा व्यायाम करा. कारण व्यायामामुळेही अँटिऑक्सिडंट बाहेर पडतात.

»  गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून दररोज सकाळी प्यावं. म्हणजे तुमची पचनशक्ती सुधारेल. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होईल.

» ग्रीन टीचं भरपूर प्रमाणात सेवन करा. ग्रीन टी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

»  दररोज किमान ग्लासभर तरी दूध प्यावं. त्यात भरपूर पोषणमूल्य असतात, जी हाडं मजबूत करतात. तसंच शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकतात.

»  कॉफीपासून लांब राहा. कॉफीच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्य मिळत नाहीत.

»  भरपूर प्रमाणात पाणी प्या. पुरुषांनी किमान ३ लिटर आणि महिलांनी २.५ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकली जातात.

»  आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करावा. कारण फायबरयुक्त पदार्थामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर आणि ओबेसिटी या आजारांची शक्यता कमी होते.

»  तुम्हाला आवश्यक असणारी जीवनसत्त्व तुमच्या आहारातून मिळतात का, याकडे लक्ष द्या. जीवनसत्त्व मिळणा-या पदार्थाचा आहारात समावेश करा.

»  शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकतात.

»  थंडगार बिया आणि साल काढलेलं कलिंगडाचा गर घ्या. आणि एक सेंटिमीटर इतका साल काढलेला आल्याचा तुकडा आणि चार बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये एकत्र करा. आता हा ज्युस सव्‍‌र्ह करा.

»  कलिंगड आणि पुदिना यांच्या मिश्रणामुळे पाणी शरीराबाहेर फेकायला मदत होते.

»  त्याचप्रमाणे काकडी आणि लिंबू, स्टॉबेरी-काकडी-लिंबू आणि पुदिना या मिश्रणामुळेही शरीराबाहेर पाणी फेकलं जातं.

Read More »

मार्जरी आसन

मार्जरी आसनाला कॅट पोझ सुद्धा म्हणतात. आसन करताना मांजरासारखा आकार दिसतो. म्हणून याला मार्जरी आसन किंवा कॅट पोझ असं म्टटलं जातं.

सुरुवातीला योगा मॅटवर वज्रासनात बसा. आता नितंबांना वर उचलून गुडघ्यावर उभं राहावं. आता दोन्ही हात मॅटवर ठेवावे. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) दोन्ही हात सरळ आणि ताठ असावेत. हे आसन आपण दोन पद्धतीने करतो. प्रथम आपण या आसनाची पहिली पद्धत पाहू या -
चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही हात पुढे तसेच दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवावं. आता श्वास घेत मानेला वरती आणावं. तसंच सिलिंगकडे बघत मनातल्या मनात दहा आकडे मोजावेत. हात बाकता कामा नये. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) आता श्वास सोडताना मानेला खाली आणावं.

तसंच पोटाला वरती आणावं. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) म्हणजेच जेव्हा आपण श्वास घेताना मानेला वरती आणावं. त्याचबरोबर नितंबाना मागे न्यावं. म्हणजेच पाठीचा भाग हा खाली जाईल. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) दहा आकडे मोजल्यानंतर श्वास सोडताना मानेला खाली आणावं. पोटाला वरती आणावं म्हणजे पाठ वर येईल या पोझिशनमध्येसुद्धा दहा आकडे मोजावे. मग रिलॅक्स व्हावं. ही आहे पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहू या.

दुसरी पद्धत

सुरुवातीला आपण आसनाची स्थिती घेतली होती तशीच स्थिती आता घ्यायची आहे. यामध्ये श्वास घेताना मानेला वरती आणायचे तसंच पोटाला खाली न्यावं. आणि श्वास सोडताना मानेला खाली आणावं आणि पोटाला वरती आणावं. हे असं सतत सात वेळा करावं. पण सतत करताना घाई करू नये. हळुवारपणे करावे. मग काही वेळ रिलॅक्स राहावे.

श्वास

 मानेला वरती नेताना श्वास घ्यावा.

 मानेला खाली आणताना श्वास सोडावा.

 हे आसन करताना श्वास हळुवारपणे सुरक्षित करावा.

 वेळ

 आसनाची पहिली पद्धत दोन ते तीन वेळा करू शकता.

 दुसरी आसनाची पद्धत दोन वेळा करावी.

आसन करताना घ्यायची काळजी

मार्जरी आसन करताना एकदम सुरक्षित स्थितीमध्ये करावं. हे आसन करताना दोन्ही हात सरळ आणि ताठ असावेत. हातांना दुमडू नये. तसंच दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवावं. मानेला वरती आणताना हळुवारपणे वरती आणावं. घाई करू नये. तसंच मानेला खाली आणतानासुद्धा हळुवारपणे खाली आणावं.

फायदे

 ज्या व्यक्तींना पाठीचा त्रास आहे त्यांनी हे आसन आवर्जून करावं.

 हे आसन पाठीच्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे.

 या आसनाने मान, खांदा आणि पाठीचा कणा यात लवचिकता वाढते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment