Tuesday, June 4, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

रक्तानुबंध

आपल्या शरीरात रक्त गोठणं अथवा त्याची गुठळी बनणं आणि पुन्हा ती विरघळणं ही प्रक्रिया सहज रूपात सुरू असते. रक्ताची गुठळी निसर्गत: बनण्याच्या या वैशिष्टयामुळेच जखम झाल्यानंतर रक्त वाहणं आपोआप थांबतं. जखम बरी झाल्यानंतर या गुठळ्या विरघळूनदेखील जातात. परंतु ज्या वेळी या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते, तेव्हा रक्ताची गुठळी तशीच राहते. दीर्घकाळ यावर उपचार न झाल्यास ते गंभीर रोगाचे रूप धारण करू शकते. ब्लड क्लॉटिंग अर्थात रक्ताची गुठळी होणं म्हणजे काय? ते कसे होते, त्याची निर्मिती आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ.

 आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे रक्त वाहत असते. सतत वाहणारं हे रक्त हृदयापर्यंत जातं आणि पंपिंगद्वारे शुद्ध झाल्यानंतर शरीराच्या अन्य मुख्य अवयवांकडे आणि पेशींपर्यंत पोहोचतं. हेच रक्त पुन्हा धमण्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवलं जातं. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमण्या आकुंचन पावतात, कारण शरीराच्या पेशी रक्त परत पाठवण्यासाठी ताकद लावतात. याच वाहत्या रक्तामध्ये कधी कधी 'क्लॉट' म्हणजेच गुठळी बनते. ही रक्ताची गुठळी आपोआपच बनते. सामान्य प्रक्रियेमध्ये ही गुठळी क्षतीग्रस्त नलिकांची दुरुस्ती करण्याचं कामदेखील करते.

असं झालं नाही तर, जखम झाल्यानंतर शरीरातील रक्ताचं वाहणं रोखणं अवघड होऊन बसेल. रक्तातील प्लाझ्मामध्ये प्लेटलेटस् आणि प्रोटिन्स असतात. जखम झालेल्या ठिकाणी ते रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून रक्त वाहणं रोखतात. सामान्यत: जखम बरी झाल्यानंतर रक्ताची गुठळी आपोआप विरघळते. पण रक्ताची गुठळी न विरघळणं आणि दीर्घकाळापर्यंत तशीच राहणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. त्यासाठी तपासणी आणि उपचाराची गरज असते. उपचार न करता दीर्घकाळ तसेच राहिल्यास रक्ताच्या गुठळ्या धमण्या अथवा नसांमध्ये जातात आणि शरीरातील कुठल्याही भागात म्हणजे डोळे, हृदय, मेंदू, फुप्फुसे, किडनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अवयवांचं काम बाधित करतात.

डोळे : रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. ही गुठळी रक्तप्रवाहाद्वारे डोळ्यामध्ये पोहोचू शकते. ही गुठळी आपल्याला दिसेल की नाही, हे ती डोळ्यांतील कुठल्या भागात आहे यावर अवलंबून असते. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना आणि नजर अस्पष्ट होणं, ही लक्षणं दिसतात. अनेकदा या गुठळ्या आपोआपच बऱ्या होतात. पण तरीही याबाबत वेळीच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण बरेचदा यासाठी शस्त्रक्रियादेखील करावी लागते.

मेंदू : मेंदूमध्ये रक्ताची गुठळी असल्यास या गुठळीचा परिणाम जोपर्यंत शारीरिक क्रिया, हालचालींवर दिसत नाही तोपर्यंत त्याची चटकन माहिती होत नाही. या संकेतांमध्ये संभावित पक्षाघात, बोलणं आणि समजण्यास अडचण, चक्कर येणं इत्यादींचा समावेश होतो. अनेकदा उलटीदेखील येऊ लागते. परिस्थिती गंभीर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

हृदय किंवा फुप्फुसे :  ज्या वेळी फुप्फुसे किंवा हृदयामध्ये रक्ताची गुठळी बनते तेव्हा त्याची लक्षणं हृदयाचा झटका येण्यासारखीच असतात. छातीच्या भागात वेदना होतात. श्वास घ्यायला अडचण येऊ लागते आणि जबडा किंवा मानेमध्ये वेदनेचा अनुभव येऊ शकतो. पाठ आणि हातांमध्येदेखील वेदना होऊ शकतात. तसंच हृदयात गुठळी बनणं, हे हृदयाचा झटका येण्याचं कारण बनू शकतं.

पाय आणि हात :  जर रक्ताची गुठळी पाय किंवा हातामध्ये बनली तर ज्या ठिकाणी ती बनली आहे, त्याच्या खालच्या भागात आणि हाताच्या कुठल्याही भागात सूज येऊ शकते. पाय आणि हाताच्या गुठळ्यांच्या सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर लाली येणं, अधिक गरम होणं आणि अस्वस्थता इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.

अस्पष्ट लक्षणं :  रक्ताच्या गुठळ्या झाल्यास अन्य प्रकारची एकत्रित लक्षणं निर्माण होऊ शकतात. यामध्ये गुडघे आणि मनगटावर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे रेषा आणि लाल दाणे दिसतात. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या अधिक प्रमाणात कमी होते. तेव्हा नाक आणि हिरडयातून रक्तस्रवदेखील होऊ शकतो. त्वचेमध्येदेखील रक्तस्रव होऊ शकतो. हा रक्तस्रव छोटयाछोटया लाल डागांच्या स्वरूपात दिसतो. या समस्येवर वेगवेगळ्या पद्धतीने इलाज केले जातात. गुठळीचे स्थान आणि रुग्णाचे आरोग्य यावर ते अवलंबून असते.

उपचार :  या समस्येसाठी अ‍ॅण्टीकोग्युलँट्स म्हणजे गुठळी बनण्यास रोखणारं औषध दिलं जातं. 'क्लॉट ब्लस्टर्स' म्हणजे रक्ताची गुठळी विरघळवणारं औषध दिलं जातं. 'कॅथेटर निर्देशित थ्रंबोलायसिस' ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कॅथेटर नावाची एक लांब नळी शस्त्रक्रियेद्वारे शरीरात टाकली जाते आणि रक्ताच्या गुठळीजवळ नेली जाते. त्याठिकाणी गुठळी विरघळवणारं औषध सोडलं जातं. साकळलेलं रक्त -हास पावण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. थ्रोंबक्टॉमी – शिरेतून किंवा धमनीतून साकळलेलं रक्त वा गुठळी काढणं, यांसारखे वेगवेगळे उपचार केले जातात.

Read More »

बार्ली-मूग सुप

नेहमीचे तेच तेच पदार्थ खाउन घरी कंटाळा येतो म्हणुन काही तरी दुसरे खाऊ  म्हणुन बार्ली मूग सुपची चव घेऊ. 

साहित्य : ३/४ वाटी मोड आलेले मूग, ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवलेली बार्ली १/२ वाटी, दोन टोमॅटो, दोन गाजर, एक कांदा, थोडीशी पानकोबी, २/३ ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या, किसून घेतलेले आले, ५-६ कढीपत्त्याची पाने, १ चक्री-फूल, दीड चमचा मालवणी मसाला (सांबार किंवा पावभाजी मसाला चालेल), लिंबाचा रस आणि मीठ चवीप्रमाणे, १ टेबलस्पून तेल, १/२ चमचा जिरे

कृती : मोड आलेले मूग आणि बार्ली एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. दोन वेगवेगळ्या पातेल्यात थोडं पाणी घालून या दोन्ही गोष्टी प्रेशर कुकरमध्ये तीन शिटय़ा येईपर्यंत शिजवून घ्याव्यात. (दोन्ही गोष्टी एका भांडय़ात एकत्रच शिजवल्या तरी चालतील) नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि चक्री-फूल घालावे. त्यानंतर ठेचलेल्या लसूण पाकळ्या, आले, गाजर, टोमॅटो, कांदा इत्यादी घालून परतावे. वरून थोडे पाणी घालून गाजर मऊ होऊपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यावे.

आता त्यात कढीपत्त्याची पाने, पानकोबी, शिमला मिरची घालावेत. वरून मालवणी मसाला आणि एक ग्लास पाणी घालावे. मिश्रण उकळले की, त्यात शिजवलेली मूग आणि बार्ली घालावी. मग पळीने किंवा पावभाजीच्या चपटया चमच्याने हे मिश्रण घोटून घ्यावे. आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर पंधरा मिनिटे शिजू द्यावे. अधून-मधून दोन-तीन वेळा मिश्रण ढवळावे.
आता चवीप्रमाणे यात लिंबू रस आणि मीठ घालावे. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे आणि एक उकळी आणून गॅस बंद करावा. असे हे पोटभरीचे गरम सुप तयार आहे. त्यावर बटर किंवा क्रीम, कोथिंबीर घातली की हे खूप खाण्यासाठी एकदम तयार!

टीप : मुगाऐवजी चवळी, काबुली चणे, राजमा, मुगडाळ,
मसुरडाळ वापरली तरी चालेल. तेलाऐवजी बटर वापरल्यास स्वाद अजून चांगला येतो.

Read More »

तुम्हाला अकारण थकल्यासारखं वाटतंय?

व्यवस्थित खाणंपिणं आणि विश्रांती घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवते का? अनेकांना ही समस्या भेडसावत असते. या समस्येची कारणं तुमच्या दिनचर्येतच आहेत. जेवणाच्या चुकीच्या वेळा, चुकीची पद्धती आणि व्यायामाचा अभाव या कारणांवर उपाययोजना करायला हव्यात.

''वैशाली आता उठशील का? आठ वाजून गेलेत. खूप उशीर झालाय. तुझे सासरे आणि नवरा दोघेही थोडयाच वेळात ऑफिसला जायला निघतील. सकाळी जेवणात काय बनवायचं हे मला सांगितलंस तर कुकर लावते. तयार होऊन किचनमध्ये ये. तुझी तब्येत तर ठीक आहे ना?''

''अरे बापरे! आठ वाजले? मला तर कळलंच नाही. लवकर लवकर बाबांसाठी ब्रेकफास्ट तयार करते. जेवणाचं नंतर बघू. हल्ली मी खूप थकते हो आई! झोपून झाल्यावरसुद्धा शरीरात स्फूर्ती वाटत नाही. अंग जड वाटतंय, जणू अनेक वर्षापासून थकलंय. सुगंधा उठली का? सध्या शाळेला सुट्टया आहेत त्यामुळे सकाळची धावपळ करावी लागणार नाही, अन्यथा आता काहीही करावसं वाटत नाहीए.''

''मला समजतं गं! लग्न होऊन या घरात आल्यापासून तू धावपळ करतेयस! पण गेल्या एक-दीड वर्षापासून मी पहातेय, पूर्वीसारखी तुझ्या अंगात स्फूर्ती नाही. पण तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वय कमी आहे. शारीरिक श्रम फारसे करावे लागत नाहीत. घरातली धुणे-झाडू-फरशी-भांडी या कामांसाठी मदतीला बाई आहे. सुगंधा तर स्कूल बसने जाते. घरात आपण अवघी चार माणसं आहोत. तुला आलेला थकव्याचे कारण जीवनशैली किंवा चुकीची आहारयोजना असू शकते.''

''खरं आहे आई, हल्ली मी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच अनियमित झाले आहे. हल्ली मी चीज, आइस्क्रीम, तसंच तळलेले आणि पचायला जड पदार्थ खात असते. गेल्या दोन वर्षात माझं वजन १० किलोंनी वाढलं आहे. तुमच्यासारखं नियमित फिरायला जाणं, व्यायाम करणं हे सर्व मला जमत नाही. आम्ही रोज बाराच्या आधी झोपतही नाही आणि सकाळी सातच्या ठोक्यापर्यंत उठणंही होत नाही. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून तुमच्यासारखे व्यायामसुद्धा करायचे आहेत. दुपारी झोपणं थांबवायचं आहे.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला कुठलाही आजार नाही, तरी मला हातापायाचे मांसपेशी दुखत राहतात. गुडघे दुखतात. सतत डोकं दुखत असतं. पोट जड वाटतं. तुम्ही याला आम्लामुळे 'अपक्व अवरस' होणारे लक्षण आहे. काम केल्याने थकवा येणं स्वाभाविक आहे. काम न केल्याने सुद्धा जेव्हा थकवा येतो, तेव्हा काय करावं?''

''आम्ही साठीला आलो. आमच्याशी तुमची तुलना होणार नाही. पण आमचंही जागरण होतं. झोप पूर्ण होत नाही. थकवा येतो. आमच्याने जास्त श्रम होत नाही. थोडे श्रम केल्यावर थकवा येणं, हे नैसर्गिक आहे. या वयात शरीराची बरीच झीज झालेली असते. आणि अन्य धातूंचे पोषणही होत नाही त्यामुळे थकवा वाढतो. पण मी नियमित मॉर्निग वॉक करते. थोडेच पण नियमित व्यायाम करते. तसंच आठवडय़ातून दोन-तीन वेळा शरीराचे मालिश करून घेते. वेळेत जेवते आणि खारीक, खजूर, अंजीर आणि बदाम नियमित खाते. यामुळे माझे स्वास्थ्य चांगलं राहतं. फारसा थकवा येत नाही.

तुम्ही तरुणांनीही या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्यात विशेष असं काही नाही. व्यवस्थित योग्य वेळी झोपणं, योग्य आहार, थोडेफार व्यायाम करणं आवश्यक आहे. तुला अ‍ॅनेमिक डिप्रेशन, इन्फेक्शन किंवा इतर कुठलेही रोग नाहीत. मासिक पाळीचा त्रास नाही. (ह्या रोगांमुळे सुस्ती येणे, थकवा येणे स्वाभाविक आहे.)

तुम्ही रात्री उशिरा जेवण घेता ते योग्य नाही. जेवण साधारण सायंकाळी आठ च्या आतच घ्यायला हवं. आणि हो, टीव्ही बघत जेवणाची जी पद्धत आहे त्यामुळे खूप नुकसान होतं. ती आधी बंद करा. त्याऐवजी थोडं खाली फिरून आलात तर शरीराला व्यायाम मिळेल. आणि त्याशिवाय ध्यान आणि प्राणायाम करणं शक्य झालं तर सुदृढ आयुष्य जगता येईल.''

Read More »

झुरक्याने होतो जीवनाला परका !

तंबाखूच्या सेवनामुळे होणारे कर्करोग, फुप्फुसाचे रोग सर्वश्रुत आहेत. मात्र या आजाराचे गांभीर्य दिवसांगणिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने धूम्रपानामुळे उद्भवणा-या कोरोनरी अर्थात हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित विकाराविषयीची विस्तृततामांडणारा लेख..

तंबाखू किंवा तत्सम हानिकारक गोष्टींवर अधिक कर लादून त्या गोष्टींच्या किमतींमध्ये प्रशासनाने बरीच वाढ केली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही, असंच म्हणावं लागेल. प्रसिद्धी माध्यमांमधून १८ वर्षाखालील मुलांनी धूम्रपान करू नये, असा संदेश वारंवार दाखवण्यात येतो. अनेक प्रकारचे नियम व अटी आहेच. परंतु तंबाखूमिश्रित पदार्थाचे सेवन करून अकाली मृत्युमुखी पडलेल्या भारतातील रुग्णांची संख्या लक्ष्य वेधून घेणारी आहे. दरवर्षी होणा-या ४,४०,००० मृत्यूंपैकी २.४ लाखांपेक्षा अधिक मृत्यू हे धूम्रपान केल्यामुळे होत आहेत. धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या मृत्यूस बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यात रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे, विविध प्रकारचे कर्करोग, ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (obstructive pulmonary disease) हा फुप्फुसांमध्ये होणारा एक चिवट रोग यांसारख्या आजारांचा समावेश आहे.

'अथरोस्लेरोसिस (रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे)' हा आजार म्हणजे धूम्रपानामुळे होणा-या सर्वाधिक मृत्यूंसाठी कारणीभूत ठरणारा आजार आहे. याविषयी केल्या गेलेल्या विविध अभ्यासांतून ही बाब स्पष्ट झाली आहे की, धूम्रपान हे कोरोनरी (हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित) हृदयविकार होण्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता बळावते. तंबाखूशी संबंधित आजार म्हणजे जागतिक स्तरावरील लोकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर समस्या बनली आहे. या विषयीच्या सर्वेक्षणानुसार, जगभरात १.१ दशलक्ष व्यक्ती धूम्रपान करतात आणि धूम्रपान करत असलेल्या २५० लक्ष व्यक्ती भारतात राहतात.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर धूम्रपानाचा होणारा परिणाम:-

> तंबाखूमध्ये असलेल्या रसायनांमुळे रक्तपेशींना धोका पोहोचू शकतो. तसंच हृदयाचं कार्य, रक्तवाहिन्यांची रचना आणि त्यांच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अर्थातच या विपरित परिणामांमुळे अथरोस्लेरोसिस हा आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.

> अथरोस्लेरोसिस (Atherosclerosis) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे रक्त वाहून नेणा-या धमन्यांमध्ये मेणासारखा चिकट पदार्थ जमतो. ज्यामुळे कालांतराने हा चिकट पदार्थ घट्ट होऊन धमन्यांचा मार्ग अरुंद करतो. याचा परिणाम ऑक्सिजनने परिपूर्ण असलेलं रक्त शरीराच्या इतर भागांपर्यंत वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर होतो.

> कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये जर हा चिकट पदार्थ जमा झाला तर कोरोनरी हृदयविकार (Coronary Heart Disease- C.H.D) उद्भवतो. काही काळानंतर या सीएचडीमुळे छातीत दुखणं, हृदयविकाराचा झटका येणं, हृदय बंद पडणं, ऐरिथमियस किंवा मृत्यूपर्यंतचे प्रसंग ओढवू शकतात.

> त्यामुळे हृदय विकाराची समस्या उद्भवण्यामागे धूम्रपान हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर रक्तातील कोलेस्टरॉलची कमी-जास्त पातळी, उच्च रक्तदाब, वाढलेलं वजन आणि स्थूलपणा यांसारख्या समस्यादेखील तितक्याच कारणीभूत ठरू शकतात. धूम्रपानाची सवय असल्यास हृदयविकार होण्याची शक्यता अधिक वाढते.

> धूम्रपानामुळे पेरिफेरल आर्टेरियल डिसीझ (peripheral arterial disease- P.A.D.) हा आजार होण्याची शक्यताही अधिक वाढते. पी.ए.डी. या आजारामध्ये, डोके आणि इतर अवयवांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो. त्यामुळे पी.ए.डी हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणं आणि स्ट्रोक यांची शक्यता अधिक असते.

> धूम्रपान कितीही कमी अधिक प्रमाणात केलं तरी त्याचे परिणाम विपरीतच होतात. काही व्यक्तींमध्ये विशेषत: गर्भनिरोधक औषधे घेणा-या महिला आणि मधुमेह असणा-यामध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे.

> धूम्रपान करताना तोंडावाटे बाहेर फेकल्या जाणा-या धुरासही 'सेकंडहँड स्मोक' म्हणतात. 'सेकंडहँड स्मोक' हा धुराचा एक असा प्रकार आहे, जो सिगारेट, सिगार किंवा पाइपच्या जळत्या बाजूने येतो. 'सेकंडहँड स्मोक'मध्येही धूम्रपानातून शरीरात ओढल्या जाणाऱ्या अनेक रसायनांचा समावेश असतो. विशेष म्हणजे धूम्रपान करणा-या व्यक्तींना ज्याप्रमाणे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका संभवतो, त्याचप्रमाणे धूम्रपान न करणा-या व्यक्तींना 'सेकंडहँड स्मोक'मुळे धोका उद्भवू शकतो. लहान मुलं, किशोर वयातील मुलांमध्ये भविष्यात 'सीएचडी' होण्याची शक्यताही 'सेकंडहँड स्मोक'मुळे वाढते आहे, कारण यामुळे:

> एचडीएल कोलेस्टरॉलचं प्रमाण (काहीवेळेस याला चांगलं कोलेस्टरॉल म्हटलं जातं) कमी होतं.

> रक्तदाब वाढतो.

> हृदयातील पेशींची हानी होते.

'सेकंडहँड स्मोक'मुळे उद्भवणारे धोके हे मुदतपूर्व जन्माला आलेल्या आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) ही समस्या असणाऱ्या नवजात बालकांमध्ये अधिक आढळतात. तसंच दम्याची प्रकृती असणा-या मुलांनाही यामुळे अधिक त्रास होऊ शकतो.


टप्प्याटप्प्याने धूम्रपान सोडले तर ..

पहिला टप्पा - २० मिनिटांनंतरतुम्ही हवा दूषित होणे थांबवू शकाल. तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होतील आणि हात आणि पायांचे तापमान वाढेल.
दुसरा टप्पा –  ८ तासांनंतरतुमच्या रक्तातील कार्बन मोनोक्सॉईडची पातळी सामान्य स्थितीस येऊन तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल.

तिसरा टप्पा - २४ तासांनंतरतुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होईल.

चौथा टप्पा - ४८ तासांनंतरनव्‍‌र्ह एंडिंग्जना निकोटिनच्या अभावाची सवय होईल. तसेच चव आणि वास ओळखण्याची तुमची क्षमता पूर्वपदावर येईल.

पाचवा टप्पा – २ आठवडे किंवा ३ महिन्यानंतरशरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारून व्यायाम करण्याची क्षमता वाढेल. त्याचबरोबर खोकला, सायनस कंजेशन, थकवा आणि श्वासलागणे यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी होईल.

सहावा टप्पा - १ वर्षानंतरहृदय विकार उद्भवण्याचा धोका धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच निम्म्याने कमी होईल.

सातवा टप्पा - ५ ते १५ वर्षानंतरधूम्रपान ज्यांनी कधीही केलेले नाही त्यांच्याइतकाच तुम्हालासुद्धा स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल.

आठवा टप्पा - १० वर्षानंतरफुप्फुसांच्या आजाराने मृत्यू येण्याचा धोका हा आयुष्यभर कधीही धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच कमी होईल. तोंड, स्वरयंत्र,अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रिपड आणि स्वादुपिंड यांसारख्या अन्य प्रकारच्या कर्करोगांची शक्यता कमी होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विज्ञान तंत्रज्ञान

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » विज्ञान तंत्रज्ञान

तंदुरुस्तीसाठी १२ मिनिटे व्यायाम पुरेसा

व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळला तरच शरीर तंदुरुस्त राहते, अशी अनेकांची समजूत असते आणि त्यासाठी काही जण महागडया व्यायामशाळांचा पर्याय निवडतात.
व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळला तरच शरीर तंदुरुस्त राहते, अशी अनेकांची समजूत असते आणि त्यासाठी काही जण महागडया व्यायामशाळांचा पर्याय निवडतात. तर काही जणांकडे तेवढा वेळच नसल्याने आणि आर्थिक गणित जुळत नसल्याने तंदुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत. मात्र, शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतका वेळ आणि पैसा खर्च करण्याची गरज नसल्याचा दिलासा संशोधकांनी दिला आहे.

आठवडयातून तीन वेळा केवळ चार मिनिटे जोरदार किंवा जास्त ऊर्जेचा वापर करून व्यायाम केल्यास त्याचे चांगले फायदे होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या व्यायामांमुळे शरीरात ऑक्सिजन घेण्याच्या पातळीत वाढ होते व रक्तदाब आणि ग्लुकोजच्या पातळीत घट होते, असे नव्या संशोधनात आढळले आहे. नॉर्वेमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी दहा आठवडयांच्या कार्यक्रमात व्यायामाच्या परिणामांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी सतत आराम करणा-या, अतिवजन असलेल्या मात्र एरव्ही निरोगी असलेल्या २६ व्यक्तींना त्यांच्या कार्यक्रमात सहभागी केले. त्यांचे दोन गट करून त्यांनी निरीक्षण केले.

पहिल्या गटातील व्यक्तींना त्यांनी आठवडयातून तीन वेळा चार मिनिटांचे व्यायाम दिले. तर दुस-या गटाला त्यांनी त्याच प्रकारचे मात्र १६ मिनिटांचे व्यायाम चार-चार मिनिटांच्या तुकडयांमध्ये करण्यास सांगितले. या दोन्ही गटांचे निरीक्षण केल्यावर शरीरात ऑक्सिजन घेण्याच्या प्रमाणात दोन्ही गटांमध्ये सारखीच वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, १६ मिनिटे व्यायाम करणा-या गटामध्ये कोलेस्टरॉल व शरीरातील मेद कमी होण्यामध्ये अधिक चांगला परिणाम दिसून आला. संशोधकांच्या मते आठवडयातून तीन वेळा अधिक ताण देऊन काही मिनिटे केलेला व्यायाम तंदुरुस्ती वाढवण्यासाठी व रक्तदाब कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतो. त्यामुळेच जास्त ताण देऊन कमी वेळेत केलेले व्यायाम फायदेशीर असतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

Read More »

इंटरनेट युझरची संख्या दुपटीने वाढणार

येत्या चार वर्षात भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या तिप्पट होणार आहे, असे 'सिस्को'च्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली- भारतात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने वाढत असून इंटरनेट युझरची संख्याही झपाटयाने वाढत आहे. येत्या चार वर्षात भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या तिप्पट होणार आहे, असे 'सिस्को'च्या अहवालात म्हटले आहे. जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात वाढत आहे.

गेल्या वर्षी भारतात १३ कोटी ८० लाख इंटरनेट युझर होते. ही संख्या २०१७ पर्यंत ३४ कोटी ८० लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज सिस्कोने व्हिज्युअल्स नेटवर्किंग इंडेक्स फॉरकास्ट या अहवालात व्यक्त केला आहे. तर २०१७ पर्यंत जागतिक स्तरावर ३.६ अब्ज लोकांकडे इंटरनेट असणार आहे, असे सिस्कोचे उपाध्यक्ष रॉबर्ट पेप्पर यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांमध्ये आणि उद्योगांनी ब्रॉडबॅँडचा वापर करण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तरीही इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढलेली नाही. इंटरनेटवर व्हिडीओ बघण्याचे प्रमाण गेल्यावर्षी एक कोटी ६० लाख होते २०१७ मध्ये यामध्ये तब्बल १० पटीची वाढ होईल. २०१७ मध्ये इंटरनेटवर व्हिडीओ बघणा-यांची संख्या ११ कोटी ३० लाखांवर जाईल, असे सिस्कोने म्हटले आहे.

इंटरनेट बघण्यासाठी कॉम्प्युटर लागतो हा समज लवकरच पुसला जाणार आहे. कॉम्प्युटरपेक्षाही स्मार्टफोन व स्मार्ट टीव्हीवर इंटरनेट बघण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१७ पर्यंत स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणा-यांची संख्या ४० टक्के तर टीव्हीवर इंटरनेट बघण्याचे प्रमाण १० टक्के असेल. भारतातील मोबाइल डेटा ट्रॅफिक २०१२ ते २०१७ पर्यंत चार पट वाढणार आहे. २०१२ रोजी हे प्रमाण अवघे तीन टक्के होते, असेही अहवालात नमूद केले आहे. येत्या २०१७ पर्यंत देशात दोन अब्ज नेटवर्किंग डिव्हाइसची मागणी असेल. सध्या ही मागणी एक अब्ज आहे, असेही कंपनीने सांगितले.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe