Tuesday, November 24, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

फुफ्फुसांचा आजार

फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. तेव्हा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज होतो. निदान वेळेत झालं नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. हा वाढणारा आजार असून तो जुना झाल्यास घातक ठरतो. हा पूर्णत: बरा होत नाही पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं.

भारत वेगाने बदलत आहे – केवळ भौगोलिक, शहरीकरण आणि आíथक पातळीवरच नव्हे तर आरोग्य, आजारांची बदलती स्थिती, आजारांचे वर्चस्व, स्थूलता आणि मृत्यूचे प्रमाण या बाबतीतही भारत बदलत आहे. भारतात सीओपीडीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढताना दिसते आणि तेही प्रमाण मागील दहा वर्षात सर्वाधिक दिसून येत आहे.

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी) हा एक फुप्फुसाचा आजार आहे. त्यामध्ये फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असतो. निदान वेळेत झालं नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. सीओपीडी हा वाढणारा आजार आहे आणि परिणामी तो जुना झाल्यास घातक ठरतो.

सीओपीडी बरा होत नाही पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार अंदाजे तीन दशलक्ष लोकांचा मृत्यू हा सीओपीडीमुळे म्हणजेच जगभरांतील मृत्यूच्या सहा टक्केमृत्यू हे यामुळे होताना दिसतात.

»  सीओपीडीची साधारण लक्षणं पुढीलप्रमाणे-
»  कफ होणे
»  श्वसनाला अडथळा होणे

कारणे

»  हा विशेष करून प्रदूषणामुळे होताना दिसतो. सीओपीडीचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूचा धूर (यामध्ये दुस-याने केलेले धूम्रपानही समाविष्ट आहे). अन्य धोकादायक घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे -

»  घरांतील प्रदूषण (उदा. ग्रामीण भागातील चुलीवरील स्वयंपाकामुळे निर्माण होणारा धूर आणि उष्णता)
बाहेरील प्रदूषण

»  कामाच्या ठिकाणची धूळ आणि रसायने (वाफा किंवा त्रासदायक घटक किंवा ज्योती)

»  लहानपणात सातत्याने होणारे श्वसनाचे आजार

»  अयोग्य पद्धतीने दम्यावर उपचार झाल्यास त्यांतूनही सीओपीडी होऊ शकतो. विशेषकरून वय र्वष ४०च्या पुढे हे होऊ शकते, पण कित्येक परिवारात हे वय ३५ वर्षावरही दिसून येते. धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे यांनाही सीओपीडीचा धोका अधिक दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे शहरांतील प्रदूषण तर गामीण भागातील बायोमास इंधनाचा वापर होय.

»  हा आजार पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येतो. शहरी महिलांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षामध्ये धूम्रपानाची सवय वाढू लागली आहे. परिणामी हे काळजीचं कारण बनलं आहे. त्याचबरोबर हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग आणि ऑस्ट्रिओस्पोरोसिसमुळेही नंतर सीओपीडी होऊ शकतो. म्हणूनच सीओपीडी हा अधिक धोकादायक ठरतो.

कसा ओळखाल?

पल्मनरी फंक्शनटेस्ट (पीएफटी) या चाचणीमध्ये व्यक्ती किती प्रमाणात श्वास आत घेऊ शकते किंवा बाहेर टाकू शकते याची चाचणी केली जाते व त्यातूनच ती फुप्फुसांपर्यंत किती प्रमाणात पोहोचते हे जाणले जाते. परिणामी त्यातूनच त्या व्यक्तीला सीओपीडी आहे किंवा नाही हे शोधले जाते. सध्याच्या सामाजिक राहणीत किंवा जीवनशैलीमध्ये प्रत्येकी १०० पैकी १० लोकांना भविष्यात सीओपीडीचा धोका आहे.

उपचार

»  याच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांना ब्राँकोडिलेटर्स म्हणजेच चांगली इन्हेलर्स तसेच तोंडातून दिली जाणारी औषधे यामुळे फुप्फुसांपर्यंत हवा पोहोचवण्यासाठी पयत्न केले जातात.

»  रुग्णाच्या स्थितीनुसार त्यांच्या श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी फिजिओथेरपी, न्यूट्रिशिअन किंवा प्रोटिनचे पदार्थ यांचे उपचार केले जातात. परिणामी आयुष्याची गुणवत्ता सुधारते. कधी कधी रुग्ण हे औषधं किंवा इन्हेलरचा उपाय करून लवकर आराम मिळवतात. जे व्यायामामुळे लवकर शक्य नसते.

»  भारतात सीओपीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धूम्रपानाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावरील घातक अशा या आजाराविषयी माहिती देणे आवश्यक असते. ग्रामीण भारतात अनारोग्यपूर्ण पर्यावरण, विशेष करून गरीब लोकांना हा धोका असतो तर शहरी भागात तंबाखूच्या सवयी, अनारोग्यपूर्ण भोजन आणि व्यायाम नसणे यांमुळे अपमृत्यू तसेच टाळता येणाऱ्या अशा आजारांवर उपचार करणे शक्य होते.

Read More »

पाचक दोडका

दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. याला हिंदीत 'तुरई' असं म्हणतात.

दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. याला हिंदीत 'तुरई' असं म्हणतात. याशिवाय इंग्रजीत हिला भाजी 'रिज्ड गार्ड', तर मराठीत 'दोडका' या नावाने ओळखली जाते.

तसंच ही भाजी 'लुफ्फा' या नावानेही ओळखली जाते. भाजीची निवडताना तिचा हिरवा रंग आणि न वाकणारा निवडावा. तसंच त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. पूर्णत: गडद असावा. ही भाजी प्रामुख्याने आंध्र प्रदेशात लोकप्रिय असली तरी महाराष्ट्रातही ती भाजीच्या स्वरूपात खाल्ली जाते. यात 'क' जीवनसत्त्व, झिंक, लोह, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज असल्याने हिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. तिचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गुणधर्म जाणून घेऊयात.

»  रक्तशुद्धीकरणाचं काम करतं. त्याचप्रमाणे यकृताचं कार्य सुधारतं.

»  पोटाचं कार्य सुरळीत करतं. फायबरयुक्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते. हा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. परिणामी मूळव्याधीचा त्रासदेखील कमी होतो.

»  याचा ज्युस कावीळ झालेल्या लोकांना दिल्याने कावीळ लवकर बरी होते.

»  मूत्रातील आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.

»  शरीरात साचलेल्या चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत करते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

»  शरीराला नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणारं हे उत्तम टॉक्सिन आहे.

»  नियमित खाल्ल्याने त्वचेचा पोतही सुधारतो.

»  पोटाचे सर्व विकार दूर करते. प्रतीकारशक्ती सुधारते. त्यामुळे या भाजीचं सेवन करावं.

»  या भाजीचा ताजा ज्युस प्यायल्याने लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ होत नाही.

»  अ‍ॅसिडिटीवर उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने अ‍ॅसिडिटीबरोबरच अल्सरचा त्रासही कमी होतो.

»  वारंवार सर्दीचा त्रास होणार असेल तर त्यांनी याचं सेवन करावं.

»  शरीरातला कोरडेपणा नष्ट करते.

»  डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून दृष्टी सुधारण्याचं काम करते.

»  केस गळण्यावरही उत्तम औषध असून दांतांच्या आरोग्यासाठीही चांगलंच आहे.

Read More »

नजराजासन

ही आसनस्थिती आपल्याला 'चला काम करा' असं सुचवते आणि काम करण्यास प्रेरणा देते. आसन प्रथम सरळ, ताठ उभे राहावे.

ही आसनस्थिती आपल्याला 'चला काम करा' असं सुचवते आणि काम करण्यास प्रेरणा देते. आसन प्रथम सरळ, ताठ उभे राहावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे डावा पाय मागील बाजूस उचलावा आणि डाव्या हाताने पायाला पकडावे. किंवा पायांच्या बोटांचा अंगठा पकडावा. तसंच उजवा हात हळुवारपणे उचलावा. व तो खांद्याच्या पातळीपर्यंतच उचलावा.

डावा पाय जेवढा वरती उचलता येईल तेवढा वर उचलावा. आता दहा सेकंद या स्थितीत उभं राहा. या आसनात आपण फक्त एका पायावर पूर्ण शरीराचा समतोल साधतो. त्यामुळे पूर्ण शरीराचा भार हा दुस-या पायावर येतो. काही सेकंद म्हणजेच दहा सेकंद थांबावे. मग थोडा वेळ थांबून हे आसन दुस-या पायाने म्हणजे उजवा पाय मागील बाजूस उचलून करावे.

श्वास

श्वास घेताना पाय मागील बाजूस उचलावे. आणि श्वास सोडताना मोकळा एक हात खांद्याच्या रेषेत ठेवावा.

वेळ

सुरुवातीला हे आसन तीन ते चार वेळा करावे. या आसनात सुरुवातीला दहा सेकंद थांबावं. मुख्य आणि महत्त्वाचे की तुम्ही सुरुवातीला जितका वेळ थांबून शरीराचा समतोल साधू शकता तितकाच वेळ थांबावं.

आसन करताना घ्यायची काळजी

या आसनात आपण एक पाय मागील बाजूस वरती नेतो तेव्हा आपण घाई करू नये. पायाला लगेच वरती नेऊ नये. त्याचे कारण असे की जर आपण पायाला मागील बाजूला नेऊन वरती आणले की मांडयांमध्ये लचक भरण्याची शक्यता असते.

तसंच आपण हाताने पायाला पकडताना स्नायूंना ताण पडतो. त्यामुळे लचक भरू शकते. असं झाल्यास आसन करणे सोडावे. थोडावेळ थांबून पुन्हा हे आसन करावे. या आसनामध्ये एक पाय मागील बाजूला वरती असतो तर दुस-या पायावर पूर्ण शरीराचा भार येतो.

तेव्हा जो पाय खाली असतो तो शक्यतो ताठ असावा. सुरुवातीला तुम्हाला समतोल राखणे अवघड जाईल. पण सरावाने तुम्ही हे करू शकता. आसन सोडताना पाय हळुवारपणे खाली आणावा.

विशेष टीप

हे आसन कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी करू नये.

फायदे

»  शरीराचा समतोल उत्तमरीत्या साधू शकतो.

»  खांदे, छाती, पोट आणि पायाला चांगल्या प्रकारे ताण मिळतो.

»  पायांमध्ये ताकद येते.

»  नियमित हे आसन केल्यास कंबरेचं दुखणं कमी होतं.

Read More »

शरीराला द्या 'आहारा'ची ऊब

मुंबई आणि उपनगरात शनिवारी पडलेल्या पावसामुळे संध्याकाळच्या वेळी चांगलेच थंडगार वारे वाहायला लागले आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी मस्त गुलाबी थंडी पडू लागली आहे. या गुलाबी थंडीचा लहानग्यांपासून ते मोठयांपर्यंत प्रत्येकच जण आनंद घेतो. गारठलेल्या शरीराला ऊब पोहोचवण्यासाठी लोकरीचे कपडे आवश्यक आहेतच, पण त्याचसोबत शरीराला आतून उष्णता पुरवणारे पदार्थही आवश्यक आहेत. यासाठी दररोजच्या आहारात शरीराला उष्णता पुरवणा-या पदार्थाचा समावेश करायला हवा.

दोन दिवसांपूर्वी पडलेल्या थंडीमुळे लोकांनी बासनात गुंडाळलेले लोकरीचे कपडे बाहेर काढले असतील. थंडी म्हटलं की, सर्दी-ताप-खोकल्याला आमंत्रण आलंच. त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी औषधे आलीच. पण या औषधांच्या सेवनासोबत आहारातील औषधी पदार्थाचे सेवन केल्यास अधिक उत्तम. या अल्हाददायक वातावरणात पौष्टिक, रुचकर तसंच औषधी गुणधर्मानी युक्त आहार घेतल्यास अधिक ताजंतवानं वाटेल.

त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. शरीर उबदार राहिल्याने हाता-पायांमध्ये अधिक चपळपणा येतो. अंगदुखी किंवा आखडण्याचे त्रास होत नाही. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण नियमित आहार करू. पण हा आहार सेवन करताना शरीराची प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करूनच या पदार्थाचा आहारात समावेश करावा. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील उबदार आहार कसा असावा.

»  सर्व ऋतूंमध्ये ताजे, गरम अन्न खाणं केव्हाही चांगले. पण हिवाळ्यात आवर्जून ताजं आणि गरमागरम भोजनाचे सेवन केल्यास उत्तम. यामुळे भूक तर भागतेच शिवाय ताजे, गरम भोजन पचायलाही सोयीस्कर पडते. वेळेवर ताजे, गरम जेवण केल्यास शरीराला जडपणा येत नाही. थोडक्यात काय, तर शरीरही उबदार राहते.

»  हिवाळ्यातील आहारात शरीराला उष्णता पोहोचवणाऱ्या पदार्थाचे सेवन निष्टिद्धr(155)तच करावे. पण त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीराची प्रकृती, पचनशक्ती लक्षात घेता आहाराचे सेवन करावे, अन्यथा उष्ण पदार्थाचे अधिक सेवन बाधक होऊ शकते.

»  भाज्या, फळे, सुकामेवा, कडधान्य, दूध-ताक सारखे स्निग्ध पदार्थ, मसाले या पदार्थाचे योग्य संतुलन राखत आहार घ्यावा.
आहाराच्या माध्यमातून मिळणारी उष्णता बाधू नये यासाठी सकाळ-सायंकाळ नियमित व्यायाम करावा. पहाटे लवकर उठून चालणे, योगा, सूर्यनमस्कार आदी व्यायाम करावेत.

»  गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजुक तुपाची धार, याचे सेवन करावे. जेवणात तांदळाच्या नेहमीच्या भाताऐवजी मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी खावी. सोबत तूपही घ्यावे. कधी ज्वारी-बाजरीची भाकरी बनवावी. त्यासोबत तूप-गूळ खाल्ल्यास चविष्ट लागते.

»  शरीराला स्निग्धता पुरवणारे पदार्थ म्हणजे दूध, ताक, लोणी. हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. नुसते गरम दूध पिण्याऐवजी त्यात केशर, बदाम, वेलची आदींचा समावेश असलेल्या दुधाचा मसाला टाकून प्यावे. तर कधी हळद टाकून दूध प्यावे. भाकरीसोबत तुपाऐवजी लोणी खावे. जेवणानंतर ग्लासभर ताक प्यावे. आवडीनुसार कधी साखर तर कधी ताकाचा मसाला टाकावा.

»  मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.

»  जिरे, लसूण, मोहरी, सुंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

»  थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळ्यात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.

»  सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.

»  साखरेला मध हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे अनेक जण मधाचा आहारात वापर करतात. हिवाळ्यात मधाचा वापर नियमित केल्यास ते उपायकारकच आहे. मधाच्या सेवनामुळे शरीर उष्ण राहते. तसेच हिवाळ्यात खोकला तर हमखास होतो.

»  अशा वेळी नुसत्या मधाचे चाटण घेण्याऐवजी मध आणि आलं एकत्र करत त्याचे चाटण बनवावे. सकाळी आणि रात्री हे चाटण नियमित घेतल्यास घशाला आराम मिळेल. दररोज एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक चमचा मध घालून सेवन केल्यास उत्तम.

»  हिवाळ्यात फुटलेल्या ओठांची काळजी घेताना त्यावर क्रीम लावण्याऐवजी दुधाची साय किंवा तूपही लावू शकतो. ओठ लगेच मऊ पडतात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment