Tuesday, October 13, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

गुणकारी तोंडली

कोकसिनिया ग्रँडिस असं शास्त्रीय नाव असलेली ही वेलवर्गातली वनस्पती आहे. हिंदीत कुंदुरी तर मराठीत ते तोंडली या नावाने ओळखलं जातं.

कोकसिनिया ग्रँडिस असं शास्त्रीय नाव असलेली ही वेलवर्गातली वनस्पती आहे. हिंदीत कुंदुरी तर मराठीत ते तोंडली या नावाने ओळखलं जातं. ही फळं सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्यानंतर ती लाल दिसतात. याची सालं हिरवी आणि पांढरी असून त्याची चव काहीशी काकडीप्रमाणे असते. संपूर्ण भारतभर या भाजीची लागवड केली जाते. यात काबरेहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शिअम, खनिज पदार्थाचा भरणा असतो. त्यामुळे याची मूळ, खोड आणि पानांपासून कित्येक औषधं तयार केली जातात. हिंदीत या भाजीला बिम्ब किंवा कुंदुरी असं म्हणतात. याची भाजी, लोणचं केलं जातं. याचे आरोग्यविषयक गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.

 यात जीवनसत्त्व अ आणि बिटा कॅरोटीन असल्यामुळे हे सारक म्हणून काम करतं. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी ही भाजी आवर्जून खावी.

  •  रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते. म्हणूनच मधुमेहींच्या रुग्णांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
  • त्वचेच्या विकारांपासून नेहमी संरक्षण करतं.
  • सर्दी, खोकला, तसंच फुप्फुसांच्या आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. अस्थमाच्या रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे.
  • रक्तशुद्धीकरणाचं देखील काम केलं जातं. हेपटायटिस बी असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही.
  •  नियमित सेवन केल्यास डोळे, किडणी, यकृत आणि हृदयाची काळजी घेतली जाते.
  • आतडय़ांचे कार्य सुरळीत होतं, त्यामुळे त्यांचे विकार नियंत्रित ठेवण्याचं काम ही भाजी करते.
  •  ताप आलेल्या रुग्णांनी ही भाजी खाल्ल्याने ताप कमी होण्यास मदत होते.
  • शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
  • यात जीवनसत्त्व क असल्यामुळे हाडांचं आरोग्य सुधारतं.

थोडक्यात शरीराच्या सामान्य संरचनेचा विकास करण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र स्तनपान किंवा गरोदर महिलांनी या भाजीचं अधिक सेवन करू नये.

Read More »

उष्ट्रासन

या आसनात शरीराच्या सर्व अंगांना उंटासारखा वाकडा आकार येतो म्हणून याला उष्ट्रासन असं म्हणतात. डोळे, टॉन्सिल्स आणि आवाजाचे विकार तसंच दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरतं.

उष्ट्र म्हणजे उंट. या आसनात शरीराच्या सर्व अंगांना उंटासारखा वाकडा आकार येतो म्हणून याला उष्ट्रासन असं म्हणतात.

आसन

प्रथम वज्रासनामध्ये बसावं. आता गुडघ्यावर उभं राहावं आणि दोन्ही पायांमध्ये साधारणत: दहा ते पंधरा से.मी. इतकं अंतर ठेवावं. सुरुवातीला मागील पाय काही सेकंद हे पायांच्या बोटावर असावेत. दोन्ही हात स्वीमिंग करतो तसे मागच्या दिशेने फिरवावे आणि मग हळुवारपणे उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडावी आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडावी. मानेला मागे न्यावे. या स्थितीत सुरुवातीला दहा सेकंद राहावं. या स्थितीत असताना शरीराचा आकार इंग्रजी अक्षर यू प्रमाणे दिसतो. आता हळुवारपणे हात सोडून पूर्वस्थितीत यावं. पूर्वस्थितीत येताना घाई करू नये.

श्वास

वज्रासनावरून गुडघ्यावर उभे राहताना श्वास घ्यावा. मागे जाताना श्वास सोडावा. आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्वास असावा.
आसन करताना घ्यायची काळजी
हे आसन योगा तज्ज्ञांसमोरच करावं. हात मागे नेताना घाई करू नये. सुरुवातीला हात स्वीमिंगच्या मूव्हमेंटसारखे करावेत. कारण असं केल्यास तुम्ही सहज हात मागे नेऊ शकता व टाचांना स्पर्श करू शकता. सुरुवातीला सात ते आठ सेकंद या स्थितीत थांबलं तरी चालेल. हळूहळू वेळ वाढवावा. आसन सोडताना घाई करू नये.

फायदे

  •  मान, खांदे आणि पाठ दुखण्याच्या तक्रारी या आसनामुळे दूर होतात.
  •  डोळ्यांच्या विकारावर देखील हे आसन खूप उपयोगी आहे.
  •  या आसनामुळे छातीला ताण मिळत असल्याने छातीचे स्नायू सुदृढ होतात.
  •  हे आसन दम्याच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर आहे.
  •  या आसनाच्या नित्य सरावाने डोकेदुखी, टॉन्सिल्सचा होणारा त्रास आणि आवाजाच्या तक्रारी दूर होतात.
  •  व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी हे आसन आवर्जून करावं, खूप फायदेशीर आहे.

विशेष टीप

  • हे आसन फक्त योगा तज्ज्ञांच्या साहाय्याने करावे किंवा त्यांच्या समोरच करावं. ज्यांना पाठीचा खूप त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये.
  •  हे आसन आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहिले जे आपण पाहिले त्याच पद्धतीने करावं. वा दुसरे असे की पायाची स्थिती ही पाय जमिनीला टच केलेली आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे. पण सुरुवातीला पायांच्या बोटावर असलेले जमल्यावरच नंतरच दुस-या पद्धतीने करावं.

Read More »

आपली काळजी आपल्याच हाती

दिवसभर तीव्र उन्हाचे चटके आणि रात्री जोरदार पाऊस असं काहीसं वातावरण पंधरा दिवसांपासून मुंबईकर अनुभवत आहेत. वातावरणातील या बदलामुळे डिहायड्रेशन, डायरिया, हिट स्ट्रोक अशा विकारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागत आहे. या तडाख्यातच आजपासून कित्येकांचे उपासही सुरू होतील. त्यातून आणखी उष्णता वाढेल. या उष्णतेपासून आपल्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. शरीराचं तापमान संतुलित राखणा-या पदार्थाची माहिती-
 उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. परतीच्या पावसाने तर मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली. दिवसभर तीव्र  उन्हाचे चटके आणि रात्री जोरदार पाऊस असं काहीसं वातावरण पंधरा दिवसांपासून मुंबईकर अनुभवत आहेत.  वातावरणातील या बदलामुळे डिहायड्रेशन, डायरिया, हिट स्ट्रोक अशा विकारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागत  आहे. त्यात घाम येणं, त्वचा काळवंडणं, थकवा जाणवणं, भूक न लागणं, उलटी होणं किंवा फूड पॉईझनिंग होणं  अशा विकारांनाही ते बळी पडतायेत. म्हणूनच या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वत:च्या  आरोग्याची  काळजी करणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायला हवं. तुम्ही खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली तरच तुम्ही शरीराचं संतुलन राखू शकता. मसालेदार पदार्थाऐवजी लो कॅलरीज असलेल्या पदार्थाना प्राधान्य द्यायला हवं. ज्या पदार्थामध्ये फायबर, कॅल्शिअमचं प्रमाण असतं. या ऑक्टोबर हिटमध्येच नाही तर एकंदरीतच शरीराचं आरोग्य नीट राखायचं असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे, असं नेहमीच सांगितलं जातं. याशिवाय या उन्हापासून वाचण्यासाठी कोणत्या पदार्थाचं सेवन केलं पाहिजे हे जाणून घेऊ या.

दही किंवा योगर्ट

दही हा अतिशय उत्तम पर्याय आहे. मग तुम्ही ते दही, ताक, लस्सी, रायता किंवा कोशिंबीर अशा कोणत्याही प्रकारात सेवन करा. ते तुमच्या शरीरासाठी चांगलंच असतं. भाज्यांबरोबर दही एक उत्तम काम करतं. दहय़ाचं नियमित सेवन करणं आवश्यक असतं. कारण ते शरीराला थंड ठेवतं. त्याचप्रमाणे त्वचेवरचे डाग कमी होण्यास मदत होते.

नारळ पाणी
नारळ पाण्यात साखर, इलेक्ट्रोलाईट्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीराला हायड्रेट राहतं. यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं. शरीराचं तापमान थंड ठेवण्यास मदत करतं. वजन कमी करण्यासाठीही हे अतिशय फायदेशीर असतं.

पुदिना
उन्हाळ्यासाठी हे अतिशय उत्तम टॉनिक आहे. पुदिन्याची चटणी करून खा किंवा दहय़ासोबत याचं सेवन करा. फायदेशीर ठरतं.

हिरव्या भाज्या
उष्ण वातावरणात हिरव्या भाज्यांचं सेवन अधिक केलं पाहिजे. कारण यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. मात्र या भाज्या अधिक प्रमाणात शिजवू नये. कारण असं केल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. काकडी, हिरवा टोमॅटो, भेंडी, आदी भाज्या आणि खरबूज, टरबूजसारखी तसंच त्या ऋतूत मिळणा-या फळांचं सेवन केलं पाहिजे.

कांदा
सध्या कांदा महागला असून तो खाण्याचे वांदे झाले असले तरीही या दिवसांत कांद्याचं सेवन करणं उत्तम असतं. यात शरीराचं तापमान थंड ठेवण्याचे गुणधर्म आहेत. हा कांदा कच्चा खाल्ला तरीही उत्तम आणि अन्य कोणत्या पदार्थाबरोबर म्हणजे आमटी, चटणी किंवा दह्यासोबत सेवन केलं तरी शरीराला त्याचा फायदाच होतो. सतत लघवी होण्यापासूनही कांदा बचाव करतो.

थंडगार सूप
ताज्या भाज्यांचं सूप करून ते थंड करून प्यावं. त्यातून शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वं मिळतात. जीवनसत्त्वं आणि खनिजंही मिळतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा यातून प्राप्त होते.

ज्यूसेस
या दिवसांत लिंबूपाण्यासारखा अन्य कोणताही ज्यूस नाही. याशिवाय संत्रं, मोसंब यासारखे ज्यूसही उत्तम आहेत. याचं कारण म्हणजे यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्यातून शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळतं. भर उन्हातही तुम्हाला ऊर्जा मिळते.

थोडक्यात काय तर उन्हाळ्यात अशा पदार्थाचं सेवन करणं आवश्यक आहे, जे पचण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागेल. पोटाला तडस लागणार नाही असे पदार्थ सेवन करावेत. कारण असे पदार्थ सुस्ती आणतात. पराठे, जंक फूड, पिझ्झा बर्गर आदी पदार्थाचं सेवन न करणंच उत्तम. अति थंड पदार्थाचं सेवन करणंही टाळावंच. कारण त्यामुळे शरीराला नुकसानच अधिक होतं.

टिप्स

  • भरपूर पाणी प्यावं.
  • कॅफिनयुक्त किंवा अल्कोहोलिक पदार्थाचं सेवन करणं टाळावं.
  • अधिक थंड पाण्याचं सेवन करू नये.
  • पचायला हलकं, पोषक आणि फॅट्सविरहित म्हणजे रसदार फळांचं आणि भाज्यांचं सेवन करावं.
  • ड्रायफ्रूट्सचं सेवनही मर्यादित ठेवावं.
  • गरम, मसालेदार, भाजलेले किंवा खारट पदार्थाचं सेवन टाळावं. यामुळे अपचन होतं. पचनक्रियेला नुकसान होतं.
  • फळं आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
  • नासलेले किंवा बराच काळ फ्रीजबाहेर ठेवलेल्या अन्नपदार्थाचं सेवन करू नये.
  • या दिवसांत सकाळची न्याहारी अजिबात टाळू नये.
  • बाहेरचे उघडय़ावरचे पदार्थ खाणं टाळावं. हॉटेलमध्ये गेल्यावरही हेल्दी आणि ताजे पदार्थ निवडावेत.
  • तुलसी, पुदिनासारख्या हर्बल वनस्पतींना आहारात समाविष्ट करा. त्यामुळे प्रकृती थंड राहील.

उपास असलेल्यांसाठी
ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवतो आहे, त्यात आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यात कित्येक जणांचे उपास असतील, यामुळे या दिवसांत आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. उपवास न खाता करण्यापेक्षा या दिवसांत पातळ पदार्थ ताक किंवा लस्सी, दूध अशा पदार्थाचं सेवन अधिक ठेवा. ताजी फळं किंवा त्या फळांचे ज्यूसेस अतिशय चांगलं ठरतील. वरीचा भात, साबुदाणा या पदार्थाचं प्रमाण कमी करावं. योग्य प्रमाणात शरीराला काबरेहायड्रेट्स मिळतील, याकडे लक्ष द्यावं. कारण या दिवसांत चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच उपवासाच्या दरम्यान दहय़ाचं सेवन अवश्य करा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment