Tuesday, July 14, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

जीवघेणा लेप्टोस्पायरोसिस

पावसाने सध्या दडी मारली असली तरीही मागच्या महिन्यात पडून गेलेल्या आणि मधून एखादी सर आणि बाकी वेळ ऊन असं काहीसं वातावरण असल्यामुळे बरेच आजार डोकं वर काढतायेत. त्यातलाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. सध्या राज्यात या आजाराने धुमाकूळ घातला आहे. हळूहळू बळींच्या संख्येने ४०चा आकडा केव्हाच पार केला आहे. हा आजार नेमका काय आहे, कशामुळे तो होतो, थोडक्यात आजाराची माहिती जाणून घेऊ या.

लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूंमुळे होत असून तो इतर दिवसांच्या मानाने पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणजे या दिवसांत या आजाराचं संक्रमण अधिक होतं. हा असा आजार आहे, जो आणखी काही आजारांची पैदास करतो. हे जिवाणू मानवी शरीरात थेट शिरत नाही तर म्हैस, घोडा, बकरी, कुत्ता आदी प्राण्यांच्या साहाय्याने मानवी शरीरात प्रवेश करतो. म्हणजे नेमका कसा? तर या प्राण्यांच्या मूत्र विसर्जनातून तो हवेत पसरतो.

आद्र्रतेमध्ये हा जिवाणू दीर्घकाळापर्यंत जिवंत राहतो. आणि तो मानवी शरीराच्या संपर्कात आला की त्या व्यक्तीला लॅप्टोस्पायरोसिस नावाचा हा आजार होतो. प्रथमदर्शनी या आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. खरं म्हणजे हा आजार जंगली प्राण्यांमध्ये अधिक आढळतो. हे प्राणी पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्या पाळीव प्राण्यांना होतो. आणि त्यांच्यामार्फत मग या प्राळीव प्राण्यांचे मालकांपर्यंत हा आजार पसरतो.

दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळेही हा आजार उद्भवतो. म्हणजे दूषित पाण्याच्या संपर्कात येणा-या व्यक्तीचे डोळे, त्वचा आणि शौचावाटे हा आजार वेगाने पसरला जातो. प्रामुख्याने या आजारात किडणीला बाधा होते. म्हणूनच या आजाराची बाधा प्रामुख्याने पूरग्रस्त भागात किंवा शेतीवाडी करणारी मंडळी तसंच अन्य रुग्णांना पटकन होते. असं असलं तरीही सध्या कानावर पडणा-या बातम्यांमुळे या दिवसांत सर्वसामान्य लोकांनीही सतर्क असणं आवश्यक आहे.

काही डॉक्टरांच्या मते, हा आजार जीवघेणा आहे. ज्या व्यक्तीला या आजाराची लागण होते, त्या व्यक्तीचे वाचण्याची शक्यता कमी असते. याची लक्षणं अगदी लवकर समजली तरच त्यावर उपचार करणं अधिक सोपं असतं. याला अनेक नावं आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर ७-डे फिव्हर, हार्वेस्ट फिव्हर, फिल्ड फिव्हर, माईल्ड फिव्हर, रॅट कॅचर्स यलोज, अशी अनेक नावं आहेत. त्याचबरोबर ब्लॅक जाँडिज म्हणूनही ओळखला जातो.

लक्षण

» डोळे लाल होणे

» डोकं, कंबर आणि पाय दुखणे हे प्रमुख लक्षण आहे.

» स्नायू दुखणे

» त्वचेवर रॅश येणे

वेळेवर निदान न झाल्यास पुढील लक्षणं दिसतात.

» मेनेन्जायटिस

» कावीळ होणे,

» किडणीला सूज येऊन किडणी निकामी होणे

» लघवी वाटे रक्त पडणे.

ही लक्षण काही ठरावीक काळामध्येच जाणवतात. उदाहरणार्थ पहिल्या ७-१२ दिवसांत याची लक्षणं दिसतात. साधारणत: ३-७ दिवसांपर्यंत आजारपण जाणवतो. यावर काही अँटिबायोटिक्स घेतली तर ही लक्षणं नष्ट होतात. ही लक्षणं पुन्हा डोकं वर काढतात. बहुतांश लोकांना अल्प काळातला आजार होतो. मात्र दुसरी पायरी ही मॅनेन्जायटिससारख्या आजाराने होते.

उपाय काय कराल?

वर सांगितलेली लक्षणं कोणत्याही व्यक्तीत आढळली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक आहे.
आपल्या परिसरात गोशाळा किंवा अन्य कोणती जागा असेल तर त्या ठिकाणांची स्वच्छता करणं आवश्यक आहे.
पावसात साचलेल्या पाण्यात खेळणा-या मुलांना थांबवायला हवं. किंबहुना पावसाच्या पाण्यात खेळायला पालकांनी सोडू नये.

ज्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते त्यांच्या मलमूत्रविसर्जनावाटे हे जिवाणू बाहेर टाकले जातात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना अशा आजाराची लागण पटकन होते.

काळजी काय घ्याल?

» पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं टाळावं.

» तुम्हाला अशा ठिकाणी जावंच लागणार असेल तर प्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यासंबंधीची औषधं बरोबर ठेवावीत, म्हणजे तुमचा या आजारापासून बचाव होईल.

» उंदीर-घुशींचा नायनाट करावा.

» कच-याची त्वरित विल्हेवाट लावावी.

» पूर्ण विश्रांती आणि हलका आहार घ्यावा.

Read More »

कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा..

कॅन्सरमधून बचावणे आणि कॅन्सरच्या उपचारांमधून सहीसलामत बाहेर येणे या दोन्ही मोठया गोष्टी आहेत.

कॅन्सरमधून बचावणे आणि कॅन्सरच्या उपचारांमधून सहीसलामत बाहेर येणे या दोन्ही मोठया गोष्टी आहेत. तुम्ही कॅन्सरच्या उपचारांमधून गेला असाल, तर तुम्ही नक्कीच हा विचार करत असाल की, तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता काय करू शकता? हो, कॅन्सरवर नक्कीच नियंत्रण मिळवता येऊ शकतं आणि ते तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाही. अर्थात, वय आणि जनुकीय जडणघडण अशा अपरिहार्य गोष्टी त्या आड येऊ शकतात, पण तुम्ही तुमचे आयुर्मान वाढवण्याकरता नक्कीच प्रयत्न करू शकता.

व्यायाम करण्याने आणि योग्य तेच खाण्याने कॅन्सरला रोखता येतं, हे पुराव्याने सिद्ध झालेलं आहे. व्यायामाच्या जोडीने योगा केल्यास स्तनाच्या कॅन्सरसारख्या अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून स्वत:चं रक्षण करता येतं. वजन नियंत्रणात येण्यास मदत होणे हा व्यायामाचा आणि योगाचा पहिला फायदा होय!

अमेरिकन कॅन्सर सोसायटी (एसीएस)च्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, वयाच्या १८व्या वर्षापासून ९ ते १४ किलो वजन वाढलेल्या स्त्रियांना, ३ किलोपेक्षा जास्त वजन वाढू न दिलेल्या स्त्रियांच्या तुलनेत स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता ४० टक्के जास्त असते.

पेशींची अतिवाढ आणि तात्पर्याने स्तनाच्या कॅन्सरला चालना देणा-या इस्ट्रोजनची निर्मिती हे त्यामागील कारण होय. रजोनिवृत्तीच्या आधी स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजन अंडाशयात तयार होत असते. रजोनिवृत्तीनंतर अंडाशय हार्मोन्सची निर्मिती थांबवते आणि इस्ट्रोजन चरबीतून तयार होण्यास सुरुवात होते. स्त्रीच्या शरीरात चरबी जितकी जास्त, तितके जास्त इस्ट्रोजन तयार होते.

व्यायामामुळे इस्ट्रोजनच्या चयापचयामध्ये बदल होत जातात. व्यायाम करणा-या स्त्रियांमध्ये 'चांगल्या' इस्ट्रोजनचे 'वाईट' इस्ट्रोजनशी असलेले गुणोत्तर २५ टक्क्यांनी सुधारते, तात्पर्याने स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो. व्यायामाला योगाची जोड दिल्याने कॅन्सरचा धोका तर टळतोच, शिवाय कॅन्सर बळावण्याची शक्यताही कमी होते.

योग्य तेच खाणे, व्यायाम करणे, निरोगी वजन राखणे आणि नियमितपणे चाचण्या करून घेण्यावर भर देणे, यामुळे कॅन्सर पुन्हा बळावण्याला रोखता येईल. वैद्यकीय चाचण्यांमधून असं निष्पन्न झालं आहे की, व्यायाम हे स्तनाच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांकरिता तसेच कोलोरेक्टल कॅन्सरमधून बचावलेल्या रुग्णांकरिता वरदान आहे. या कॅन्सरमधून बचावलेले आणि नियमितपणे व्यायाम करणारे रुग्ण व्यायाम न करणा-या रुग्णांपेक्षा अधिक काळ जगल्याचं दिसून आलं आहे.

कॅन्सरमधून बचावलेल्या रुग्णांनी किंवा कॅन्सरला आळा घालून इच्छिणा-या व्यक्तींनी आठवडयातून १ ते २ तास जलद चालण्याचा व्यायाम करावा किंवा १५० मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. थोडक्यात, आठवडयातील ५ दिवस ३० मिनिटं व्यायाम करावा किंवा जलद चालावे.

व्यायामामध्ये अवयवांचे चलनवलन उत्तम राखण्याकरिता स्ट्रेचिंग, जलद चालणे, धावणे आणि पोहण्याचा समावेश असावा. या व्यायामांमुळे कॅलरी जळण्यात आणि वजन घडण्यात मदत होते. त्यामुळे तुमचा कार्डियोव्हॅस्क्युलर फिटनेस वाढण्यात आणि त्या अनुषंगाने हृदयविकार, पक्षाघात आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यात मदत होते.

कॅन्सरवरील उपचार घेऊन झाल्यानंतर करायच्या व्यायाम प्रकारांखेरीज योगा करणे, स्तनाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांना लाभदायी ठरते. सततचे उपचार संपल्यानंतर रोजचे आयुष्य जगायला सुरुवात करणे कधीकधी तणावपूर्ण ठरू शकते. या आयुष्याशी जुळवून घेण्याकरिता योगासारखी शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करणारी प्रणाली अवलंबिल्यास हा बदल अधिक सुसहय़ करता येऊ शकतो.

बैठया आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्याकरिता शक्य तेवढे सर्व प्रयत्न करणे आणि व्यायाम करणे अशा उपाययोजनांतून आरोग्यदायी राहणीमान साध्य करता येते.

Read More »

टाकळा

आतापर्यंत आपण मसाले आणि फळं यांचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे पाहिलं. थोडक्यात त्यांचे औषधी फायदे जाणून घेतले. आता आपण भाज्या आणि त्यांचे औषधी उपयोग जाणून घेऊया. सध्या पावसाळा सुरू असल्याने या पावसाळ्यात मिळणा-या काही विशिष्ट भाज्यांनी सुरुवात करू या. आपल्याकडे कित्येक भाज्या पावसाळ्यात मिळतात. त्यांची नावंदेखील आपल्याला माहीत नसतात. टाकळा, गोमेटू, कुर्डू अशी काही नावं सांगता येतील. कारण ही जंत्री तशी मोठीच आहे. प्रथम आपण टाकळा या भाजीविषयी जाणून घेऊ या.

ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. सिसालपिनेसी या कुळातील असलेल्या या भाजीचं नाव कॅसिया टोरा असं आहे. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते.

महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी टायकळा किंवा टाकळा या नावाने ओळखली जाते. तर काही ठिकाणी ती तरोटा किंवा तरवटा या नावानेही ओळखली जाते.

ही भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. याला पिवळसर रंगांची फुलं येतात. पान द्विलिंगी असून रात्रीच्या वेळी ती मिटतात. ही पानं लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती असतात. काळसर किंवा करडया रंगाच्या शेंगा असून त्यांचं टोक आडवं कापल्यासारखं असतं. मात्र कठीण आवरणाच्या असतात. या वनस्पतीचा वास उग्र असतो.

» टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य आणि एमोडीन ग्लुकोसाईड असतं.

» सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. भाजी किंवा बियांचा लेप वाटून तो त्वचाविकारावर लावावा. पानं आणि बियांमध्ये कायझोजेनिक आम्ल असून ते त्वचाविकारावर अतिशय गुणकारी आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो. याशिवाय इसब, अ‍ॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
लिंबाच्या रसात मुळं उगाळून ती गजकर्णासाठी वापरतात.

» पानांचं भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात.

» दात येणा-या लहान मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यांना दिल्याने तापावर नियंत्रण येतं.

» पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून द्यावा. आराम पडतो.

» टाकळ्याची भाजी ही मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते.

» या भाजीचं वरचेवर सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते.

» पचायला हलकी, तुरट आणि मलसारक आहे.

» पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment