Monday, May 30, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

स्त्रियांमध्ये वाढतोय हृदयरोग

हृदयरोगामुळे होणारे स्त्रियांचे मृत्यू गेल्या वीस वर्षात कमी झाले असले, तरी पुरुषांच्या तुलनेत त्याचे प्रमाण जास्त आहे. स्तन आणि फुप्फुसांच्या कर्करोगापेक्षाही हृदयविकाराने मरण पावणा-या स्त्रियांची संख्या कितीतरी जास्त आहे. आठपैकी एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होतो, तर तीनपैकी एका स्त्रीला हृदयरोग असतो. मात्र स्त्रियांमध्ये हृदयविकाराविषयी जागरूकता निर्माण करून त्यायोगे हृदयविकारामुळे होणारे हजारो मृत्यू थांबवता येऊ शकतात.

सरकारी कार्यालयात काम करणा-या एका ४२ वर्षाच्या स्त्रीला दररोज तिच्या कल्याणच्या घरापासून नरिमन पॉइंटपर्यंत ट्रेनने प्रवास करावा लागतो. ट्रेन पकडण्यासाठी पाय-यांवरून चढ-उतार करताना आपल्याला धाप लागत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यांचं वजन ५५ किलो आणि शरीरयष्टी बारीक असल्यामुळे आरोग्याला तसा काही धोका नव्हता. त्यांनी फोर्टसि, कल्याण येथे आरोग्याची तपासणी करून घेतली आणि त्यात केलेल्या ताणतणाव चाचणीचे निष्कर्ष धक्कादायक निघाले.

त्यानंतर केलेल्या कोरोनरी अन्गिगोग्राममध्ये त्यांना डबल व्हेसल डिसीज (दुहेरी रक्तवाहिनी आजार) असल्याचे निष्पन्न झाले आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या दुहेरी रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टी केली. आता त्या वैद्यकीयदृष्टया ब-याच चांगल्या आहेत आणि त्यांची कष्ट करण्याची वृत्ती आणखी सुधारली आहे. रुग्ण योग्य वेळेस दाखल झाल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होण्याआधीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वेळ वाया न गेल्यामुळे शारीरिक गुंतागुंतही टाळता आली.

आज अमेरिकेत हृदयरोग हा स्त्री आणि पुरुषांसाठी धोकादायक ठरलेला पहिल्या क्रमांकाचा आजार आहे. दर ८० सेकंदाला एक स्त्री हृदयरोगाने मरण पावते आणि हृदयरोगामुळे होणा-या मृत्यूपैकी तीन तृतीयांश मृत्यू वेळीच योग्य उपचारांच्या मदतीने टाळता येण्यासारखे असतात. ८० टक्केस्त्रियांमध्ये हृदयरोगासाठी कारणीभूत ठरणारे किमान एक धोकादायक लक्षण असते, मात्र बहुतेक महिला हृदयरोगामुळे आपल्या आरोग्याला धोका आहे असे मानत नाहीत.

३० ते ३५ वयोगटातील ६० टक्के भारतीय शहरी स्त्रियांना हृदयरोगाचा धोका असतो. गेल्या ५ वर्षात स्त्रियांच्या रक्तवाहिन्या आणि हृदयरोगात (सीव्हीडी) १६ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशिया भागातील सीव्हीडीमुळे वेळेआधीच होणा-या मृत्यूचे प्रमाण किमान २०२५ पर्यंत २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हृदयरोगामुळे होणारे स्त्रियांचे मृत्यू गेल्या वीस वर्षात कमी झाले असले, तरी पुरुषांच्या तुलनेत त्याचे प्रमाण जास्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन हार्ट असोसिएशनने (एएचए) स्त्रिया आणि हृदयरोगाविषयी नवे वैज्ञानिक निवेदन जाहीर केले आहे. एएचएच्या म्हणण्यानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची विविध कारणे असतात.

हृदयविकाराचा झटका येणा-या स्त्रिया आणि पुरुषांच्या शरीरात जास्त गुंतागुंत तयार होते. त्याचप्रमाणे झटका येऊन गेल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मृत्यू होण्याचा दरही जास्त असतो. यावर्षीचा फेब्रुवारी महिना 'गो रेड फॉर वुमन' म्हणून साजरा करण्यात आला. स्त्रियांमध्ये हृदयविकाराविषयी जागरूकता निर्माण करून त्यायोगे हृदयविकारामुळे होणारे, परंतु टाळता येण्यासारखे हजारो मृत्यू थांबवणे हा या संकल्पनेचा हेतू होता.

भारतातही अशा प्रकारचे अभियान सुरू करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण बहुतेक स्त्रिया स्तनांचा कर्करोग किंवा मानेच्या कर्करोगाचा जास्त विचार करतात. मात्र, स्तन आणि फुप्फुसांच्या कर्करोगापेक्षाही हृदयविकाराने मरण पावणा-या स्त्रियांची संख्या कितीतरी जास्त आहे. आठपैकी एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होतो, तर तीनपैकी एका स्त्रीला हृदयरोग असतो.

स्त्रियांमध्ये हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक कोणते?

»  आशियाई देशांत मधुमेहाने साथीच्या रोगाप्रमाणे उग्र स्वरूप धारण केले असून मधुमेह असणा-या स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता तीन पटींनी जास्त असते. माझ्या अनुभवानुसार मधुमेही स्त्रियांमध्ये वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्तवाहिन्यांचा विकार होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं.

»  वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्तवाहिन्यांचा विकार होण्याची अनुवंशिकता असल्यास

»  स्थूलत्व विशेषत: ओटीपोटाच्या भागात

» डिस्लीपिडीमिया (रक्तातील लिपिड्सचे असंतुलित प्रमाण (उदा. ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल आणि किंवा फॅट फोस्फोलिपिड्स))

»  धूम्रपान

»  ताण

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झालेले इस्ट्रोजेनचे प्रमाण आणि इतर आजारांची गुंतागुंत हेसुद्धा स्त्रियांमध्ये सीएडी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. ताणाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दशकांत भारतीय स्त्रियांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात हिरिरीने काम करत आहेत, मात्र घरगुती कामांतून त्यांची सुटका झालेली नाही. त्याच्या जोडीला मुलांच्या मागण्या, न्यूक्लियर कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील इतरांचा मर्यादित पाठिंबा या घटकांमुळेही स्त्रियांवरील ताण सातत्याने वाढत आहे.

काम करणा-या स्त्रिया ब-याचदा चुकीचा आहार घेतात आणि व्यायाम करत नाहीत. त्यामुळेही भारतीय स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. रक्तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. छातीत दुखण्याची जागा तीव्र थकवा, धाप लागणे, अपचन, जबडा किंवा घसादुखी, पाठीच्या वरच्या भागात दुखणे यांनी घेतली आहे.

रक्तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या बहुतेक स्त्रिया उशिरानेच डॉक्टरकडे धाव घेतात. या विलंबामुळेच प्राथमिक अँजिओप्लास्टीसारखे उपचार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी प्रमाणात सुचवले जातात. विलंब झाल्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमधील गुंतागुंतही वाढलेली असते. हृदयविकाराच्या झटक्यातून सावरणा-या फार कमी स्त्रियांना हृदयाचे पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जातो.

स्वत:ला वाचवण्यासाठी काय कराल?

»  हृदयविकाराच्या संभाव्य धोकादायक लक्षणांची माहिती घ्या. मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहका-यांनाही माहिती द्या.

»  वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करा. तुमचे वय तीसपेक्षा जास्त असेल, तर स्तनांची तपासणी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे तपासणी करून घेण्याबरोबर हृदयाचे परीक्षणही करून घ्या.

»  वर सांगितल्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे तुमच्यात किंवा कुटुंबीयांत दिसल्यास तातडीने वैद्यकीय सेवा घ्या.

»  लक्षात घ्या. पहिला तास हा सुवर्णतास असतो. या तासाभरात मिळालेला उपचार तुमच्या आरोग्यावर लघु व दीर्घकालीन परिणाम करणारा असतो.

»  स्वत:ला ताणमुक्त करण्याची सवय लावून घ्या.

»  चांगला आहार घेण्याची सवय लावा आणि धूम्रपान करू नका. घरी तसेच कामाच्या ठिकाणी धूम्रपानमुक्त वातावरण मिळावे म्हणून प्रयत्न करा.

Read More »

जर्दाळू

जर्दाळू हेही एक फळ असून ते अर्धाल्म वर्गात मोडते. कच्चे असताना ते थोडे आंबट असते. पण पिकताना त्यातील आम्लता कमी होऊन साखर वाढत जाते. हे अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक फळ असून ते लोकप्रिय आहे. जर्दाळू हे कवची फळ आहे. मात्र ही कवची त्याच्या गराच्या आत बी भोवती असते.

जर्दाळू हा गोल अगर किंचित लांबट असून काहीसा चपटा असतो. आकार थोडा पीचसारखा, पण बराच लहान, रंग पिवळट असतो. फळ झाडावरच पिकू लागल्यास पीचसारखाच त्याचा मंद पण सुरेख गंध आसपास दरवळतो.

ग्रीक वैद्यकात जर्दाळूला औषधी अन्न म्हणून उल्लेखले आहे, तर रोमन लोक प्रणयाची देवता व्हीनस हिचे फळ म्हणून जर्दाळूकडे पाहतात. युरोपात जर्दाळूची ओळख अ‍ॅलेक्झांडरच्या काळात झाली.

मध्यपूर्वेतही जर्दाळू त्याच्या चवीमुळे व उत्तेजक सुगंधामुळे फार लोकप्रिय आहे. जर्दाळूमध्ये अनेक मूल्ये आहेत. इतर कोणत्याही सुक्या मेव्यापेक्षा अधिक मूल्ये तिच्यात आहेत. जॅम, जेली, मार्मालेड, मिठाई यात जर्दाळूचा वापर खूप प्रमाणात केला जातो.

»  ताज्या फळात नैसर्गिक साखर, 'अ' जीवनसत्त्व आणि कॅल्शियम विपुल प्रमाणात असते.

»  यातून बी कॉम्प्लेक्स, रिबोफ्लेविन, निअ‍ॅसिन तसेच 'क' जीवनसत्त्वही मिळते.

»  जर्दाळूची बी प्रथिने व मेद यांनी परिपूर्ण असते.

»  जर्दाळूतील तेल हे रासायनिक व इतर दृष्टयाही बदामाच्या तेलासारखे असते.

»  जर्दाळूचे फळ बी, कवच, तेल आणि त्याची फुले यांचा वापर औषधी म्हणून होत आला आहे.

»  चीनमध्ये विशिष्ट प्रदेशातील जर्दाळूच्या झाडाच्या सालीपासून बनवलेले औषध जर्दाळूतील सोने या नावाने ओळखले जाई. आयुष्य वृद्धीसाठी हे औषध प्रसिद्ध आहे.

»  स्त्रियांच्या रोगावर जर्दाळू हे अधिक उपयुक्त सिद्ध होत असल्याचे चीनमध्ये मानले जाई. म्हणून जर्दाळूची फुले स्त्रियांच्या प्रसाधनात बरीच वापरली जात.

»  जर्दाळूच्या सालीच्या तेलात बदामाच्या तेलाचे सर्व गुणधर्म असून ते गुंगी आणण्यासाठी, आचके थांबण्यासाठी सर्वत्र वापरले जाते.

»  मलावरोधावर एक सौम्य रेचक म्हणून जर्दाळू चांगला आहे.

»  जर्दाळूची अल्कलीयुक्त प्रतिक्रिया तो पोटात जाताच सुरू होते. ते पचनाला मदत करतात. म्हणून जर्दाळू हे जेवणाआधी खावेत.

»  झाडावर पिकलेल्या जर्दाळूचे 'मार्मालेड' हे मानसिक दुर्बलतेमुळे होणा-या अपचनावर उपयुक्त आहे.

»  जर्दाळूमध्ये लोह विपुल प्रमाणात असल्याने रक्तक्षयावर ते उत्तम औषध आहे.

»  भरपूर प्रमाणात जर्दाळू खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

»  ताज्या जर्दाळूच्या रसात मध किंवा साखर मिसळून दिल्यास त्याचा तापात खूप उपयोग होतो.

»  डोळे, आतडी, यकृत, हृदय आणि मज्जातंतू यांना खनिज व जीवनसत्त्व मिळून बळ येते.

»  जर्दाळूच्या पानांचा रस काढून तो त्वचारोगात वापरला जातो. खरूज, इसब, सौरदाह, कंड सुटणे यावर तो वापरल्यास फायदा होतो.

»  जेवणानंतर जर्दाळू खावा. सहसा जर्दाळू वाळवून अधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे ते सहज पचतात.

Read More »

हृदयरोपण कसं होतं?

महाराष्ट्रामध्ये सध्या हृदयरोपणांची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये मुंबईतील दोन लहान मुलांना नवी हृदये मिळाली. जगभरात दरवर्षी जवळपास १२०० हृदयरोपणं केली जातात.

हृदय बंद पडणे अथवा हार्ट फेल्युअर हे लहान मुलांमध्ये हृदयरोपण करावे लागण्याचे सर्वसाधारण कारण आहे. ब-याचदा हार्ट फेल्युअरकरिता कारणीभूत असलेल्या मूळ कारणावर उपचार करून हार्ट फेल्युअरवर उपचार केले जातात. अज्ञात कारणांनी किंवा उपचार न करता येण्याजोग्या कारणांनी हार्ट फेल्युअर झाले असे फार कमी वेळा घडते.

हार्ट फेल्युअरची समस्या जसजशी वाढत जाते, हृदयाचा आकार तसतसा वाढत जातो. या समस्येस डायलेटेड कार्डियोमायोपथी असे म्हणतात. या समस्येमध्ये २ वर्षाच्या मुलाचे हृदयही प्रौढ माणसाच्या हृदयाच्या आकाराइतके होऊ शकते. नेहमीच्या कामांनीही मूल थकायला लागते, इथपासून या समस्येची सुरुवात होते.

पाय सुजणे, चेहरा किंवा पोटाला सूज येणे, अतिथकव्याने मुलाला/मुलीला वारंवार हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. त्यांना तोंडी घ्यायची जी काही औषधे दिली जातात, ती त्यांच्या लक्षणांना बरे करण्यास असमर्थ ठरतात. घरच्या घरी पंपने द्यायची दोन इन्ट्राव्हेनस औषधे उपलब्ध आहेत, ज्यांनी बरं वाटू शकतं. पण, अशा वेळेस त्यांची हार्ट फेल्युअरची समस्या वाढत जाऊन त्यांचा मृत्यू होण्याची संभावना वाढीस लागते.

अशा मुलांमध्ये हृदयरोपण करणे हितावह ठरते. त्यांच्यावर हृदयरोपण करता येऊ शकते का, हे पाहण्याकरता सर्वप्रथम काही रक्त तपासण्या आणि इतर तपासण्या करून घेतल्या जातात. थोडक्यात, त्यांना हृदयाखेरीज इतर कोणत्याही अवयवाचा (विशेषत: फुप्फुसांचा) आजार नाही ना हे तपासले जाते. मग त्यांचे नाव विभागीय प्रत्यारोपण समितीच्या रोपण यादीमध्ये समाविष्ट केले जाते आणि त्याला हृदय देणा-या दात्याची प्रतीक्षा केली जाते.

त्यानंतर रुग्णाचे वजन आणि रक्तगट यांच्याशी मिळताजुळता मेंदू मृत पावलेला दाता शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. उपलब्ध असलेल्या हृदयाकरिता दोन मुलांचे अर्ज आलेले असतील तर ज्याची अवस्था अधिक गंभीर आहे त्याला हृदय दिले जाते.

सुयोग्य दात्याचे हृदय उपलब्ध झाल्यास त्याच्याशी मिळत्याजुळत्या मुलाला/मुलीला तत्काळ त्याचे/तिचे नाव नोंदवून घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले जाते. पद्धतशीर प्रक्रियेनंतर दात्याचे हृदय ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णापर्यंत पोहोचवले जाते. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या/तिच्या शरीरातून जुने हृदय काढण्याची सर्व तयारी झालेली असते.

नव्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मुलाच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या जातात. मुलाच्या शरीराकडून नवे हृदय नाकारले जाऊ नये याकरिता त्याला विशिष्ट औषध दिले जाते (इम्युन-सप्रेसण्ट) त्या मुलाने/मुलीने आयुष्यभर हीच इम्युन-सप्रेसण्ट्स थोडया-थोडया प्रमाणात घेत राहणे गरजेचं असतं. रोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्भवू शकणारा सर्वात मोठा धोका म्हणजे शरीराने नवे हृदय नाकारणे, फुप्फुसांमधील दाबामुळे किंवा संसर्गामुळे हृदय नाकारले जाणे हा होय.

सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर शस्त्रक्रियेनंतर दहाव्या दिवशी मुलाला घरी पाठवलं जातं. घरी काळजी घेताना काय करावे आणि काय करू नये याची व घ्यायच्या खबरदा-यांची यादी त्या मुलाच्या/मुलीच्या कुटुंबाला दिली जाते. मुलाला संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे, सांगितलेली औषधे न चुकता घेणे आणि नियमितपणे फॉलो-अपकरिता येणे या त्यांतील काही गोष्टी होत.

पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे या काळात वारंवार फॉलो-अपकरिता यावे लागते, त्यानंतर फॉलो-अपचे प्रमाण कमी होते. काही गुंतागुंत झालीच, तर ती रोपणानंतरच्या पहिल्या वर्षात होण्याची शक्यता असते. रोपणानंतरचे पहिले वर्ष सुरळीत गेले तर मुलाची कुटुंब आणि रोपण करणा-या डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास टाकायला हरकत नसते.

हृदयरोपणानंतर मुलांची परिस्थिती कशी असते याबद्दल खूप सारा डेटा उपलब्ध आहे आणि या डेटानुसार त्यांची परिस्थिती रोपण केलेल्या प्रौढांपेक्षा अधिक चांगली असते असे दिसून आले आहे. हृदयरोपण केलेल्या शंभर मुलांपैकी ८५ मुले वर्षानतर जिवंत राहतात आणि चांगले आयुष्य जगतात असे या डेटातून दिसते.

२० वर्षानंतर यांतील ४५ मुले अजूनही जिवंत असतात आणि चांगले आयुष्य जगत असतात. या डेटाकडे नीट पाहिले तर हृदयरोपणाने त्या लहान मुलांच्या/मुलींच्या आयुष्यामध्ये केलेला आमूलाग्र बदल तुमच्या लक्षात येईल. रोपणापूर्वी त्या लहान मुलाचे/मुलीचे आयुष्य फारसे बरे नसते, त्याच्या/तिच्यावर मृत्यू सतत घिरटया घालत असतो. पण रोपणानंतर, ते मूल आनंदी जीवन जगू शकेल आणि एक चांगला, सक्रिय नागरिक बनू शकेल याच्या शक्यता खूप जास्त असतात.

Read More »

अश्व संचलनासना

अश्वसंचलनासना हे आसन सूर्य नमस्कारामधले चौथे आसन आहे.

योगा मॅटवर वज्रासनामध्ये बसावे. आता गुडघ्यावर उभे राहावे. हळुवारपणे डावा पाय मागे न्यावा, दोन्ही हात हे पायाच्या बाजूला असावेत. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) अलगदपणे मानेला वरती न्यावं.

मानेला जेवढं मागे नेता येईल तेवढंच मागे घेण्याचा प्रयत्न करावा. पण त्याचबरोबर दोन्ही हातांचे तळवे हे जमिनीला स्पर्श केलेले असावे. (चित्रात दाखवल्याप्रमाणे स्थिती असावी) काही सेकंद थांबावं.

डावा पाय जितका मागे ताणू शकता तितका मागे ताणावा. डाव्या पायाला पुढे न्यावं नंतर उजव्या पायाला मागे आणावं. काही सेकंद थांबावं.

श्वास

» वज्रासनात श्वास हा नियमित असावा.

» दीर्घश्वास घेत सुरुवातीच्या स्थितीत यावं.

» श्वास सोडताना पायाला मागे न्यावं.

» अंतिम स्थितीमध्ये श्वास थांबवून ठेवावा.

» श्वास घेत पूर्वस्थितीत यावं.

» वज्रासनात नियमित श्वास घ्यावा

वेळ

सुरुवातीला दहा आकडे मोजावेत आणि मग हळूहळू आकडे वाढवावेत. हे आसन दोन ते तीन वेळा करावं.

आसन करताना घ्यायची काळजी

अश्व संचलनासनामध्ये पायाला मागे नेताना घाई करू नये. तसंच जेवढं ताणता येईल तितकं ताणावं. मानेलाही जेवढा ताण शक्य होईल तितकाच द्यावा. सुरुवातीला जास्त ताण देऊ नका.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना गुडघ्याला आणि घोटयाला लागले असेल त्यांनी हे आसन करू नये.

फायदे

»  या आसनाने पोटाला चांगलाच ताण मिळतो.

»  पाय आणि कंबरेच्या खालच्या भागालाही ताण मिळतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe