Monday, May 16, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

आरोग्य सेवा तुमच्या घरी

'हेल्थकेअर अ‍ॅट होम' ही हेल्थकेअर आरोग्य सेवा पुरवणारी संस्था आहे. घरी जाऊन किमोथेरपीचं इंजेक्शन देणे, आयसीयूची सर्व्हिस घरी देणे आणि मॅटर्निटी सर्व्हिस प्री अँड पोस्ट अशा कित्येक गोष्टी ही संस्था घरच्या घरी उपलब्ध करून देते.

हॉस्पिटलपेक्षाही कमी किमतीत ही सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. रुग्णांना अधिक सोयीस्कर होतं. ही इतकी सोयीस्कर होण्याचं कारण म्हणजे ही मंडळी नियोजित वेळेला उपस्थित राहतात. तसंच पेपरलेस काम असतं, अगदी हुबेहूब हॉस्पिटलप्रमाणे हे काम करतात. किमोथेरपी, आयसीयू आणि आई-बाळ यांना देण्यात येणा-या सर्व्हिसेसही तुम्हाला देतात.

हेल्थकेअर ही भारतीय कंपनी डाबर आणि हेल्थकेअर अ‍ॅट श आहे.

रुग्णाला अधिकाधिक सुरक्षित आणि सहोम, यूके या दोन कंपनींच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य सेवा पुरवणारी साखळी कार्यरत आहे. उत्तमोत्तम आरोग्यसेवा पुरवणे हा कंपनीचा मुख्य उद्देहज सोपं अगदी त्यांच्या दरवाजाबाहेर सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात हा मुख्य उद्देश आहे.

त्यांच्या अन्य काही सेवांमध्ये आयसीयू अ‍ॅट होम, कार्डियाक केअर, होम ऑन्कोलॉजी सर्व्हिस, पोस्ट सर्जिकल केअर, होम पल्मोनॉलॉजी सर्व्हिसेस, होम फिजिओथेरपी सर्व्हिस ओव्हर डायव्हर्स कॅटेगरी, आहारविषयक सेवा आणि आणखी बरंच काहींचा त्यात समावेश आहे. साधारणत: महिन्याभरात पाच हजार रुग्णांना तपासलं जातं. यासाठी अंदाजे खर्च ५०० रुपये ते २० हजार इतका येतो.

Read More »

उन्हाळ्यातील आहार

निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणे स्वाभाविक असते, मात्र या बदलांना जुळवून घेणे आपल्या हातात असते. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. परंतु ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. 

निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणे स्वाभाविक असते, मात्र या बदलांना जुळवून घेणे आपल्या हातात असते. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. परंतु ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. यासाठीच हा आहार नेमका कसा असावा, आहारसूत्रात कोणता बदल करावा, हे जाणून घेऊ या.

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अ‍ॅसिडिटी, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे या समस्या उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार, तसेच आहार-विहारानुसार ही लक्षणं कमी-अधिक असू शकतात, मात्र या वातावरणाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण होतं.

आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराचं तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करते. मेंदूतील हायपोथॅलिमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो व तहान भागवण्याची क्रिया घडते.

खूप थंडी असो वा उष्णता, शरीराचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रित केलं जातं. मात्र ही पातळी नियंत्रित राखण्याची यंत्रणा नीट काम करू न शकल्यास समस्या उद्भवतात. जसं उन्हाळ्यात घाम येऊन हे तापमान योग्य राखलं जातं, मात्र यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणं गरजेचं असतं.

»  या काळात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होऊन हिटस्ट्रोक, सनस्ट्रोक होऊन अस्वस्थ वाटणं, ग्लानी येणं, प्रचंड डोकेदुखी, रक्तदाब वाढणे वा कमी होणे, त्वचा कोरडी पडणे ही लक्षणे दिसू लागतात. यात शरीरातील मीठ व पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्याला 'हायपोनेट्रिमिया' म्हणतात. ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करून कधी कधी ते जीवावरही बेतू शकतं.

»  उन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अति व्यायाम करणं, तळलेले, मसालेदार व तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं या गोष्टींमुळे उन्हाळ्यातील समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात योग्य आहारविहाराची आवश्यकता असते.

»  उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं व पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे.

»  शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं व भाज्यांचे रस, सरबतं आणि द्रव पदार्थाचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये. साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो.

»  खनिजक्षार व जीवनसत्त्व हेदेखील खूप गरजेचे असतात. म्हणून शहाळ्याचं पाणी, लिंबूपाणी, ताक, दही, कैरीचं पन्हं यांचं सेवन करावं. तसेच काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करावा.

»  या काळात पचायला हलका असा आहार घ्यावा. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्यं जरूर खावीत. याचबरोबर गायीचं दूध, वरण-भात, खिचडी असे सुपाच्य पदार्थाचं सेवन करावं.

»  या काळात पचनक्रिया मंदावलेली असते, तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, बेकरीतील उत्पादनं, जंक फूड, काबरेनेट ड्रिंक्स यांचं सेवन वज्र्य करावं. तसेच चहा, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणा-या पदार्थाचं सेवन करू नये.

»  उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न अजिबात खाऊ नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

»  रात्रीचा आहार हा अत्यंत हलका असावा. मांसाहारी पदार्थ शक्यतो सकाळ किंवा दुपारच्या वेळेतच सेवन करावेत. तसेच रात्रीचा आहार झोपण्यापूर्वी तीन तास आधी घ्यावा.

Read More »

उन्हाळ्यात खा गुलकंद

गुलाबाचे फूल जितकं नाजूक आणि मोहक आहे तितकंच त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला गुलकंद चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.

जसजसा उकाडा वाढायला लागतो तसतसं पित्त, जळजळ, उष्माघात यासारखे आजार आपलं डोकं वर काढायला सुरुवात करतात. मग गर्मीपासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी आणि तृष्णाशामक गुलकंदच घ्या. या गुलकंदाचे आरोग्यदायी फायदे

पुढीलप्रमाणे -

»  शरीरात थंडावा निर्माण करण्याचं काम करतो.

»  वाढत्या उकाडय़ामुळे शरीराचा होणारा दाह कमी होतो.

»  डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.

»  पित्त, जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

»  गुलकंदामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो

» त्वचा आरोग्यदायी बनवते. त्वचेच्या आरोग्यासाठी गुलाब फारच हितकारी आहे. गुलाबाचा मंद सुगंध आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्मामुळे अनेक फेसपॅकमध्ये, आंघोळीच्या पाण्यात गुलाबाचा वापर केला जातो. गुलकंद खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो.

» गुलकंदात गुलाबाबरोबर साखरही असल्याने शरीराला व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई'चा पुरवठा होतो.

» जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन उत्तम होण्यास मदत होते. उन्हाळ्यात होणारे पचकाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते. गुलकंद हे उन्हाळ्यात ऊर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे.

घरच्या घरी कसा बनवाल गुलकंद?

» गुलकंद करण्यासाठी गावठी गुलाब वापरावेत. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेले गुलाब वापरू नयेत. आयुर्वेदिक उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं सांडू कंपनीचे गुलकंद उत्तम प्रतीचं, शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेलं आणि प्रवाळयुक्त आहे.

» गुलकंदासाठी गुलाब पाकळ्या आणि साखर समप्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर घालून घ्यावा.

» मिश्रणाचे पातेलं झाकून आठवडाभर दिवसा सूर्यप्रकाशात तर नंतर सावलीत ठेवावे आणि दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.

» सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात विघटित होतात. आणि गुलकंदाला लाल रंग येतो.

» मग तयार झालेल्या गुलकंदाचे तुम्ही नियमित सेवन करू शकता.

» गुलकंदात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींनी गुलकंद खाणं टाळावं.

Read More »

खजूर

खजूर हेही अतिशय पौष्टिक फळ असून पूर्वापार ते सहारा वाळवंटात पोळीइतकेच महत्त्वाचे मानले गेले आहे. आता त्याचा वापर जगभर होतो. त्याचे गुणधर्म पिकलेल्या ताज्या आणि सुकवलेल्या दोन्ही प्रकारांत कायम राहतात हे विशेष.

पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे तेवढेच लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते. झाडावर पिकलेल्या खजुराची गोडी वेगळीच असते. मात्र तो लवकर आंबू लागतो. म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते.

माणसाने लागवडीस आणलेल्या प्राचीन फळांपैकी हे एक फळ आहे. मेसापोटेमियात सापडलेल्या ५००० वर्षापूर्वीच्या विटांवरील लिखाणात खजुराची लागवड करण्याविषयीच्या सूचना सापडतात, तर इजिप्तमधील स्मारकांवर खजुरांच्या झाडांची चित्रे कोरलेली आहेत.

बायबलमध्ये हे झाड व फळ यांचे गुण सांगणारे कित्येक उल्लेख आहेत. प्रेषित महंमद पैगंबर असे मानीत होते की, देवाने माणूस निर्माण केल्यावर उरलेल्या त्या खास मातीतून झाड निर्माण केले आहे.

खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया अगर पार्शियाचे आखात असावे, असे मानतात. आज जगातल्या प्रमुख पिकांत त्याची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन व अमेरिका इतक्या ठिकाणी याचे पीक घेतात. खजुरात शरीरास पोषक अशी द्रव्ये भरपूर आहेत. ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील साखर त्यातून मिळते.

»  खजूर नुसता दुधाबरोबर घेतल्याने त्याचे पोषणमूल्य वाढते.

»  खजूर हे पौष्टिकतेमुळे टॉनिक मानले गेले आहे.

»  खजूर सहज पचत असल्याने शक्ती व उत्साह पुरवून तो रुग्णाची झीज लवकर भरून काढतो.

»  खजूर घालून उकळलेले दूध मुलांना व आजारी व्यक्तींना विशेषत: आचके येत असल्यास गुणकारी ठरते.

» खजुरातील निकोटिनमुळे आतडय़ाच्या तक्रारींवर तो रामबाण ठरतो.

»  मेटचिनकाफ या रशियन शास्त्रज्ञाच्या मते खजुराचा भरपूर वापर केल्याने आतडय़ातील अपायकारक जंतूंची वाढ रोखली जाऊन आटोक्यात राहते.

»  खजूर हे सारक फळ आहे.

»  दारू व तत्सम पदार्थाची नशा खजुरामुळे उतरते.

»  दुबळय़ा हृदयासाठी खजूर चांगला आहे.

»  लहान मुलांच्या मनगटाला खजूर कडे बनवून बांधावा. दात येताना त्याला तो चघळू द्यावा. यामुळे हिरडय़ा मजबूत होऊन दात ठिसूळ होत नाहीत.

»  खजूर निवडताना खबरदारी घ्यावी. कारण सालीच्या चिकटपणामुळे त्यावर धूळ व रोगजंतू चिकटतात. नीट केलेला चांगल्या प्रतीचा खजूर घेऊन नेहमी धुऊनच तो वापरावा.

Read More »

गरुडासन

आसनस्थितीत शरीराचा आकार गरुडाप्रमाणे दिसतो म्हणून त्याला गरुडासन असं म्हणतात.

दोन्ही पायांवर सरळ आणि ताठ उभं राहावं. आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. उजवा पाय सरळ ठेवा आणि डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावरून घेऊन मागे पायाला लॉक करावा. (चित्रात दाखवल्याप्रमाणे पायाला विळखा घालणे) ज्याप्रमाणे वेल झाडाला विळखा घालते त्याप्रमाणे घालावा.

शरीराचा तोल सांभाळावा. त्याचप्रमाणे हातांचाही विळखा घालावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हात चेह-याच्या बरोबर समोर असावेत. या आसनात काही सेकंद थांबावे. या आसनात पूर्ण शरीराचा तोल सांभाळावा. थोडा वेळ विश्रांती करून दुस-या पायाने हे आसन करावं.

श्वास

आसनाला सुरुवात करताना दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यावं. श्वासोच्छ्वास हा नॉर्मल असावा.

वेळ
»  हे आसन दोन वेळा करावं.
» सुरुवातीला दहा आकडे मोजावेत आणि मग हळूहळू आकडे वाढवावेत.

आसन करताना घ्यायची काळजी

गरुडासन या आसनात पूर्ण शरीराचा तोल सांभाळावा लागतो. म्हणूनच हे आसन करताना समोर एक फोकस ठेवावा आणि हळुवारपणे हे आसन करावं. डावा पाय आपण उजव्या पायात वळवतो तेव्हा या पोझिशनमध्ये काही सेकंद राहावे. शरीराचा तोल सांभाळणे आणि मग दोन्ही हात एकमेकांत नमस्कार या पद्धतीने गुंफवावे. या आसनस्थितीत पूर्ण शरीराचा तोल सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला काही सेकंद थांबावे. मग हळूहळू सेकंद वाढवावेत. आसन सोडताना काळजी घ्यावी. अलगदपणे आसन सोडावं. प्रथम हातांना पूर्वस्थितीत आणावे. मग पायांना पूर्वस्थितीत आणावे. थोडा वेळ विश्रांती करून ते आसन दुस-या पायाने करावे. आसन सोडताना घाई करू नये अन्यथा तोल जाऊन तुम्ही पडू शकता. तेव्हा हे आसन घाई घाईत करू नये. किमान आठ ते दहा सेकंदांपर्यंत आसनस्थितीत राहावे.

फायदे

» गरुडासनाने एकाग्रता, मजबूतपणा वाढतो. स्नायूंची बळकटी वाढते.

» या आसनाने हाता-पायांमधील संधिवात कमी होण्यास मदत होते.

» या आसनामुळे पाय सशक्त आणि मजबूत बनतात. तसंच एका पायावर पूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याची कला अवगत होते.

» गरुडासन हे पाठीच्या वरच्या भागासाठी खूप उपयोगी आहे.

» या आसनाच्या नित्य सरावाने नितंब आणि पोट-या दुखण्याची तक्रार नाहीशी होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe