Tuesday, February 9, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

धनुरासन

२ नुरासन या आसनात शरीराचा आकार हा बाणविरहीत धनुष्यासारखा दिसतो. म्हणून याला धनुरासन असं म्हणतात.

योगा मॅटवर पोटावर झोपावं. दोन्ही हात शरीरालगत असावे. आता गुडघ्यापासून पाय मागे वळवावे. आता दोन्ही हात पायांच्या घोटय़ांना पकडावं. तसंच शरीराचा वरील भाग वर उचलावा. छाती आणि डोकं वर उचलावं. हात सरळ आणि ताठ ठेवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती असावी. शरीराचा वरील भाग जेवढा वर उचलता येईल तेवढाच वरती उचलावा.

या आसनात शरीराचा भार हा पोटावर येतो. (नाभीभोवतालचा वर्तुळाकारा भागावर भार येतो.)

श्वास

सुरुवातीच्या पोझिशनमध्ये दीर्घ श्वास घ्यावा. जेव्हा शरीराला वरती आणाल तेव्हाच श्वास रोखावा. फायनल पोझिशनमध्ये नियमित श्वासोच्छश्वास असावा.

वेळ

» या आसनस्थितीत सुरुवातीला दहा आकडे मोजावेत. हळूहळू आकडे वाढवावेत.

» हे आसन तीन ते पाच वेळा करावे.

आसन करताना घ्यायची काळजी

हे आसन करताना जेवढा सुरुवातीला ताण देऊ शकाल तेवढाच द्यावा. सुरुवातीला पायाला वरती आणावं. नंतर शरीराचा वरील भाग वरती आणावा. तसंच मानेला वरती आणावं. तसेच वरच्या दिशेला बघावं. ताण देऊ शकाल तितकाच ताण द्यावा. या आसनात पोटावर खूप भार पडतो.

फायदे

»  हे आसन नित्य सरावाने केल्यास पाठीचं कुबड कमी होण्यास मदत होते. तसेच पाय, गुडघा व हाताचा संधिवात नाहीसा होतो.

»  या आसनाने शरीरातील चरबी कमी होते.

»  पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

»  स्त्रियांसाठी हे आसन खूपच फायदेशीर आहे. कारण मासिक पाळीची अनियमितता अािण प्रजनन तंत्रातील तक्रारी या आसनामुळे दूर होतात.

»  हे आसन नियमित केल्यास शरीरात आळस येत नाही. त्या व्यक्ती नेहमीच स्फूर्तीशील आणि कार्यशील असतात.

विशेष नोंद

ज्या व्यक्तिंना उच्च रक्तदाब, हर्णिया, पेप्टिक अल्सर, अशक्त हृदय असलेल्या व्यक्तिंनी हे आसन करू नये.

Read More »

शेवग्याच्या शेंगा

शास्त्रीय नाव मॉरिंगा ऑलिफेरा असं असून इंग्रजीत याला ड्रमस्टिक असं म्हणतात. तर हिंदीत याला सहजन, सुजना, सेंजन, मुनगा अशी नावं आहेत. मॉरिंगेशिए कुळातली मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणारी वनस्पती आहे.

उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील ही वनस्पती असून तिची फुलं, पानं तसंच शेंगाचा वापर पाककृती करण्यासाठी होतो. या शेंगांच्या बियांपासून निघणारं तेल घडयाळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वंगण म्हणूनही वापरतात.

» वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी र्निजतुक करण्यासाठी वापरलं जातं.

»  तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. म्हणजे आराम पडतो.

»  यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. जेणेकरून हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. ज्युस किंवा त्याचा रस नियमित आहारात समाविष्ट करलेयास हाडं मजबुत होतात.

»  रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

»  रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे.

»  घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी म्हणजे त्रास कमी होतो.

»  गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. जेनेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसुतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध याच्या सेवनाने वाढतं. आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते.

»  मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस एकविस दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते.

»  अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही कम करते. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो.

»  उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

»  नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.

Read More »

डोळ्यांखालच्या वर्तुळांपासून सुटका

कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे?

कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे?

बटाटा

काळवंडलेल्या त्वचेवर बटाटा लावला जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर बटाटयाच्या पातळ काप करून त्यांना किमान २० ते २५ मिनिटं डोळ्यांवर ठेवावं. त्यानंतर पुन्हा चेहरा धुऊन घ्यावा.

टोमॅटो

टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस घालावा. त्यात बेसनपीठ आणि हळद घालून त्याची पेस्ट डोळ्यांभोवती २० मिनिटं लावून ठेवावी. आठवडयातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास लवकर फायदा होईल.

एक कप टोमॅटोच्या रसात पुदीन्याची पानं, लिंबाचा रस आणि मीठ घालावं. हा ज्युस तयार केल्यावर ताबडतोब प्यावा. असा ज्युस दिवसातून दोन वेळा आठवडाभर प्यायल्याने काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते.

बदाम तेल

बदामाचं तेल खुपच फायदेशीर आहे. डोळ्यांभोवतालच्या भागाला लावून ठेवावं. दहा मिनिटांनी डोळ्यांना हलका मसाज करून ते स्वच्छ करून घ्यावं.

टी बॅग

कित्येकांच्या घरी टी बॅग्ज असतात. या बॅग्ज वापरल्या की फेकून दिल्या जातात. पण वापरलेल्या टी बॅग्जचाही तुम्ही वापर करू शकता. यात असलेलं टॅनिन डोळ्यांच्या आजूबाजूची सूज आणि त्वचेचा काळसरपणा दूर करण्यास मदत करते.

गुलाब पाणी

डोळे बंद करून त्यावर गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस दहा मिनिटं ठेवावा. जकाळेपणा कमी तर होईलच पण त्याचबरोबर थंडावाही वाटेल.

पुदीना

पुदीन्याची पानं चुरगळून त्यांना डोळे आणि आजूबाजूच्या भागावर ठेवावं. नंतर धुऊन टाकावं.

संत्र

संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. हे विटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. संत्र्याच्या रसात थोडं ग्लिसरीनचे थेंब मिसळून ही पेस्ट दररोज डोळ्यांवर ठेवावेत. काळी वर्तुळं लवकरच दूर होतील.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब हातावर घेऊन त्याने हलक्या हाताने मालिश करावं. असं केल्याने डोळ्यांकडे रक्तपुरवठाही व्यवस्थित होतो आणि आरामही मिळतो.

काकडी

काकडीचा रस किंवा काकडीची सालं डोळ्यांवर ठेवावी. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. आणि काळ्या वर्तुळांपासून आरामही मिळतो.

लिंबू

लिंबाच्या रसात क जीवनसत्त्व असल्याने ते डोळळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यास मदत करतात. कापसाच्या साहाय्याने लिंबाचा सर डोळ्यांभोवतालच्या त्वचेवर लावावा. दहा मिनिटं ठेवून नंतर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही आठवडे दिवसातून एकदा हा प्रयोग करावा.

आणखी दुसरा प्रकारही तुम्हाला करता येईल. एक चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे टोमॅटो प्युरी, चिमूटभर बेसन आणि हळदी पावडर करून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यावं. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवावी. आठवडयातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा.

Read More »

गरोदरपणातील पायांच्या समस्या

गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. त्यामुळे त्यांच्या वजनाचा भार हा त्यांच्या पायावर पडत असतो. म्हणूनच या दरम्यान पायाच्या समस्या निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

आजकाल गरोदरपणात पायातली शक्ती कमी होणे, दुखणे, जड वाटणे किंवा खेचल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. कित्येक स्त्रियांना तर रात्री झोपण्यापूर्वी पाया आखडणे किंवा दुखणे अशा समस्या निर्माण होतात. गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच काही महिलांचुा पायावर सूज यायला सुरुवात होते.

सकाळी झोपून उठल्यावर कमी होते आणि संध्याकाळी अधिक असते. यामुळे कित्येक वेळा मांडीवर निळळ्या नलिकांचं जाणंही स्पष्ट दिसतं. कधी कधी तर शिरांमध्ये रक्त जमा होतं तर कधी कधी नलिका मोठया होऊन व्हेरीकोस व्हेन्सचा त्रासही होऊ शकतो. अशा कोणत्याही समस्या बाळ आणि आईसाठी भयंकर ठरू शकतात.

याची कारणं काय आहेत?

»  बराच वेळ खुर्चीवर बसून पाय लोंबकळत ठेवणे किंवा कित्येक तास उभं राहणे

»  अनुवंशिक कारणांमुळेही ही समस्या गर्भवती महिलांमध्ये आढळते.

»  रक्ताभिसरणाचा अर्थ शुद्ध रक्त शरीराच्या इतर भागाला पुरवणे असा असतो. नको असलेलं अशुद्ध रक्त बाहेर फेकलं जातं. प्रत्येक ठोक्याला हृदय रक्त पाठवत असतं. ही अशूद्ध रक्त घेऊन शुद्ध रक्त पाठवण्याची प्रक्रिया सतत सुरु असते. मात्र ही प्रक्रिया कमी झाली तर त्याचा परिणाम आई आणि बाळावर होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती स्त्रियांच्या पायांमध्ये अधिक वेळ अशुद्ध रक्त साचू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कसा उपाय कराल?

»  या अवस्थेत नियमित फिरणं आवश्यक आहे त्याचप्रामणे पायाचा हलका-फुलका व्यायामही करणं आवश्यक आहे.

»  वर सांगितलेल्यापैकी कोणतंही लक्ष आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे धाव घ्यावी. दोन महिन्यांनी आपल्या पायांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

»  आपल्या पायांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याची गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण या समस्या निर्माण झाल्यावर त्यांना कित्येक प्रकारच्या गोळळ्या घ्याव्या लागतात ज्या त्यांच्यासाठी नुकसानकारक आहेत.

»  एक तासापेक्षा अधिक वेळ उभं राहणं टाळावं. तसंच कित्येक वेळ पाय लोंबकळून ठेवून बसू नये. त्याचप्रमाणे कडक कडा असलेल्या खुच्र्याचा वापर कमी करावा.

»  ऑफिसला जाणा-या महिलांनी आपल्या कामाच्या दरम्यान अधून मधून पायाना व्यायाम द्यावा. सतत खुर्चीवर बसण्याऐवजी अधूम मधून फिरावं.

»  थंडीच्या दिवसांत खूप गरम पाण्याचा वापर करू नका. तसंच खूप वेळ उन्हात बसू नका. पायाच्या शिरा उन्हात बसल्याने प्रसरण पावतात. आणि त्या ठिकाणी खराब रक्त जमा व्हायला सुरुवात होते.

»  खूप दमल्यास पायांवर थंड पाणी टाकावं. आणि रात्री झोपताना पायाखाली लोड किंवा उशी घेऊन झोपावं.

»  शक्य असल्यास पायांना आराम देण्यासाठी स्टॉकिंग्ज घालावेत.

»  पायांना अचानक सूज आल्यास चोवीस तासाच्या आत त्वरीत डॉक्टरांकडे संपर्क साधावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe