Thursday, May 7, 2015

शुक्रजंतू कसे वाढवावे | स्पर्म कसे वाढवावे | शुक्राणू कसे तयार होतात | शुक्राणू वाढवण्याचे मराठी घरगुती उपाय | शुक्राणू वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय | ताकद कशी वाढवावी | शुक्राणु वाढविण्यासाठी आहार | शुक्रजंतू उपाय | शुक्राणु वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय



वंध्यत्व निवारणातील आधुनिक उपचारपद्धती

शुक्रजंतू कसे वाढवावे | स्पर्म कसे वाढवावे  | शुक्राणू कसे तयार होतात  | शुक्राणू वाढवण्याचे मराठी घरगुती उपाय  | शुक्राणू वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय  | ताकद कशी वाढवावी  | शुक्राणु वाढविण्यासाठी आहार  | शुक्रजंतू उपाय  | शुक्राणु वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आजकाल कित्येक जोडप्यांना मुल लवकर होत नाही. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. या वंध्यत्वामागे बरीच कारणं असतात. मात्र या कारणांवर मात करून आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करून वंध्यत्वाचं निवारण करू शकतो. अशा या उपचारपद्धतीची माहिती करून घेऊया.

मानव महानता, बुद्धिमता, सामर्थ्य आणि तर्कसंगतीची कौशल्ये यांमध्ये विकसित झाला असला तरीही, त्याला गर्भधारण क्षमतेमध्ये अपयशच आलं आहे. मानवाचं किंवा लोकसंख्येच्या जननक्षमतेची शक्ती म्हणजेच गर्भधारण क्षमता. सध्या मानवजातीमध्ये जननक्षमतेची शक्ती सर्वात कमी आहे. एकाच चक्रामध्ये जननक्षम जोडप्यामध्ये गर्भधारणा राहण्याचं प्रमाण जास्तीत जास्त ३० टक्के आहे. यामुळे वंध्यत्व किंवा सब-फर्टाईल जोडपे या विषयांवर चर्चासत्र होतात.
जननक्षमतेमधील आव्हानं
सब-फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची विविध कारणे आहेत. स्त्री जोडीदाराचे वय तसेच त्यांचे जतन अंडे टीटीसी (गर्भधारणेची वेळ) ठरवतात. ६-१२ महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर वेळोवेळी निदान आणि मूल्यांकन करणं आवश्यक आहे.
उपचारपद्धती
युवा जननक्षम जोडप्यांमध्ये प्रत्येक महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता २० टक्के असते. त्यामध्ये अंडमोचन किंवा शुक्रपेशींची संख्या कमी असणे यांसारख्या तक्रारी असल्यास, अंडाशयाचे विगमन (ओव्हय़ुलेशन) किंवा इन्ट्रायुटेराईन इन्सेमिनेशन (आययूआय)सारखे उपचार करून ही शक्यता सामान्य शक्यतेप्रमाणे (१५-२०) टक्केकरता येते.
यापलीकडे, सहायक प्रजनन तंत्र आहेत. यामध्ये बंद झालेल्या अंडवाहिनींमधील आव्हानं दूर करणे, एन्डोमेट्रिओसिस, अ‍ॅनोव्हय़ुलेशन, शुक्रजंतूंची संख्या अति कमी असणे, वीर्य बाहेर पडल्यावर त्यात शुक्रजंतू नसणे, अंडाशयाचे जतन कमी असणे इत्यादी अडचणींवर इन व्ह्रिटो फर्टिलायझेशनच्या मदतीने मात केली जाऊ शकते. इन व्ह्रिटो फर्टिलायझेशन हे सर्वोत्तम प्रमाणित तंत्र आहे आणि ते आयव्हीएफच्या मदतीने पुढील पिढीमधील बाळाचे स्वागत करण्यासाठी उपयुक्त आहे.
अंडाशयाच्या उत्तेजनावर नियंत्रण ठेवून, अंडयाची वाढ करणे, स्त्री शरीरामधून या अंडयांना बाहेर काढणे आणि नियंत्रित निकषामध्ये या अंडयांना शुक्रजंतूसोबत सुपीक बनवणे या मार्गाने आयव्हीएफ काम करते. पारंपरिक आयव्हीएफ मोठया संख्येत चांगल्या शुक्रजंतूसोबत या प्रत्येक अंडयांचा थर बनवून कार्य करते.
तरीसुद्धा, शुक्रजंतूची संख्या कमी असते किंवा पुरुषांमध्ये शुक्रजंतू नसतात, तेव्हा या स्थितीसाठी इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) हे तंत्रज्ञान वापरलं जातं. यात प्रत्येक अंडयामध्ये एक उत्तम शुक्रपेशी इंजेक्ट केली जाते, व त्यावरून फलन होते. त्यामधून तयार झालेला गर्भ पुढे पूर्ण विकसित होईपर्यंत नियंत्रित तापमान व वातावरणामध्ये इन्कीब्युटरमध्ये ठेवला जातो. त्यानंतर त्यामधून निवडक एक किंवा दोन गर्भ हळुवार माता बनू इच्छिणा-या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये टाकला जातो.
आधुनिक वंध्यत्व निवारणाबद्दलच्या समजुती व व्याख्या (डिकोडिंग)
न्यूनतम आवश्यक मात्रेमध्ये सर्वोत्तम अंडयांची वाढ करणे या आव्हानासाठी, सर्वोत्तम अंडं व शुक्राणू निवडणे आणि उच्चस्तरीय गर्भ तयार करणे हे आव्हानात्मक आहे. सरासरी ४० टक्केगर्भ उच्च प्रतीचे असतात. फारच थोडे वापर न करता येण्यासारखे असतात आणि उरलेले सरासरी असतात. या व्यतिरिक्त, आयव्हीएफमुळे गर्भधारणेचा दर ४० टक्केवाढतो. संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की, ३०-४० टक्के सर्वोत्तम गर्भ असतात म्हणून त्यामुळे यशस्वी गर्भधारणा होते.
गर्भ तयार होतो, तेव्हा त्यामधील केवळ ३० टक्के अनुवंशिक स्वरूपात तयार झालेले असतात आणि प्रत्येक आयव्हीएफ चक्रामधून गर्भधारणा का होत नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण ते दिसताना व्यवस्थित असलं तरी प्रत्येक गर्भाची आतून व्यवस्थित वाढ झालेली नसते.
नवीन काय?
स्त्रीचं वय जसं वाढत जातं, त्याप्रमाणे तिचा गर्भ असामान्य होत जातो. तिच्या ४० वर्षाच्या वयातील १०पैकी केवळ २ गर्भ सामान्य असतात. ही फार मोठी संख्या आहे. या परिस्थितीचे उपचार घेणारे बरेच रुग्ण आणि उपचार करणारे डॉक्टर यांना याबद्दल माहितीच नसते. यासाठी पीजीएस हे नावीन्यपूर्ण तंत्र आहे. पीजीएस किंवा प्रिइम्प्लान्टेशन जेनेटिक स्क्रीिनग हे व्यवस्थित तंत्र गर्भाची बायोप्सी करण्यासाठी आहे आणि जेनेटिक स्क्रीिनगसाठीसुद्धा आहे ज्यामुळे सामान्य गर्भ निवडणे आणि तो गर्भाशयामध्ये सोडणे या बाबी शक्य होतात.
ज्या जोडप्यांना याची गरज असते त्यांमध्ये गर्भधारणा वयापेक्षा जास्त वय असलेले (एएमए), वारंवार गर्भधारणेमध्ये अपयश आलेले (आरपीएल), वारंवार रोपण (इम्प्लान्टेशन) न होणे आणि शुक्रपेशींची संख्या फारच कमी असणे या प्रकारच्या रुग्णांची संख्या असते. पीजीएसमध्ये गर्भाचे तिस-या दिवशी तपासण्यासाठी आणि अहवालानुसार सामान्य गर्भाची निवड करून पाचव्या दिवशी तो गर्भाशयात सोडणे यांसाठी मदत करते. मग गर्भाचे सातव्या दिवशी रोपण होते.
जनन क्षमतेसोबत काय चुकीचं घडू शकतं?
आपण केलेला गर्भ सामान्य असल्याची खात्री केली तरीही, त्यामध्ये काय चुकीचं असू शकतं?
सुपीक जमिनीमध्ये बी वाढते आणि तिचे फलन होऊन मुळे अंकुरतात आणि माता पृथ्वीकडून त्या गर्भाला पोषण मिळते. हेच गर्भाशयाच्या भित्तीवर होते, गर्भाशयाच्या स्तराला एक थर असतो ज्याला एन्डोमेट्रियल लायिनग असतात आणि त्यावरून स्पंजसारखा मुलायम बिछाना तयार होतो तो आईच्या उतींपासून तयार होतो.
त्याला रोपण म्हणतात. कोणत्याही कारणांसाठी हा बिछाना निरोगी नसल्यास, गर्भाची वाढ होत नाही. गर्भधारणा होत नाही किंवा लवकर गर्भपात होतो. हा एन्डोमेट्रियल बिछाना निरोगी असल्याची खात्री करून आणि अडथळे किंवा आजारापासून मुक्त असणे हे सारखेच महत्त्वाचे आहे.
गर्भाशयाचे मूल्यांकन दोन टप्प्यांत केलं जातं-मूलभूत अल्ट्रासाउंड किंवा थ्रीडी अल्ट्रासाउंड आणि हिस्टेरोस्कोपी.
जननक्षमता उपचाराआधी हिस्टेरोस्कोपीवरून कोणतीही असामान्यता असल्यास ती लक्षात येते. तरीसुद्धा, योग्यपणे ठेवलेले गर्भ, सामान्य गर्भाशय पोकळीमध्ये रोपण होत नाही. अशा उदाहरणामध्ये एन्डोमेट्रियल रिसीप्टिव्हीटी एॅरे हे तंत्र उपलब्ध आहे, जे रुग्णासाठी रोपणाचा वैयक्तिक मार्ग उपलब्ध करतात.
ईआरए विशिष्ट दिवशी परिणामकारक रोपणासाठी केले जाते. ही चाचणी उपचाराच्या एक महिना आधी केली जाते. ही गर्भ हस्तांतरण करण्यासाठीची अनुकरणीय पद्धत आहे आणि गर्भ हस्तांतरण करण्याऐवजी, हस्तांतरणाच्या दिवशी बायोप्सी केली जाते. ही बायोप्सी नंतर दोनशे वेगवेगळ्या जीन्ससाठी तपासली जाते ज्यावरून रिसेप्टिव प्रकार लक्षात येतो. यामुळे रुग्णासाठी व्यक्तिगत रोपणाचा मार्ग उपलब्ध होण्यास मदत होते.
विविध उपचार प्रकार उपलब्ध असण्यासह प्रजनन विज्ञान फारच आवड निर्माण होण्यासारखे आहे- युटेरियन ट्रान्सप्लान्ट, युग्मकांचे स्टेमसेल निर्मिती आणि बरेच नवीन क्षेत्र यांमध्ये आहेत. चिकित्सकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित संशोधन करून, सुरक्षित मार्गाने उपचार करून रुग्णांना लाभ करून द्यावा.

आरोग्यदायी उन्हाळा
उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार संभवतात. यात प्रामुख्याने त्वचाविकार, उष्माघात आणि नाकातून होणा-या रक्तस्रवाचा समावेश होतो. या विकारांपासून वाचण्यासाठी थोडीशी दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधनं ठेवली तर परिणाम खूपच सकारात्मक होतात.
उन्हाळ्यात होणारे काही आजार व त्यांची कारणं खालीलपैकी सांगता येतील.
उष्णतेमुळे होणारे आजार : उष्माघात, सतत होणा-या उलटय़ा, नाकातून होणारा रक्तस्रव आणि सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी
त्वचेवरील परिणाम : सूर्यप्रकाशामुळे होणारा त्वचेचा क्षोभ, त्वचा काळवंडणे, अकाली वृद्धत्व
डोळ्यांवरील परिणाम : मोतीबिंदू, डोळ्यांचा दाह, रेटिनाला होणारे नुकसान
डासांमुळे होणारे आजार : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया
पाण्यामुळे होणारे आजार : अतिसार, आमांश, विषमज्वर, कॉलरा, कावीळ, यकृतावरील सूज, जंताचा प्रादूर्भाव
उन्हाळ्यामध्ये साधारणपणे : सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे 'उष्माघात' होय. यालाच 'उन्हामुळे येणारी तिरमिरी'देखील म्हणतात. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीदेखील शक्यता असते.
धोक्याचे घटक
= उष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणा-या लोकांमध्ये आढळतो.
= अर्भकं व चार वर्षापर्यंतची लहान मुलं, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो.
= तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनादेखील उष्माघाताची लागण सहज होऊ शकते.
उष्माघाताची कारणे
उष्माघाताचा संबंध तापमानाबरोबरच वातावरणातील आद्र्रतेशी असतो. वातावरणात आद्र्रता जास्त असली तर उष्माघाताची शक्यता अधिक असते. सर्वात उच्च ताप (सामान्यत: उष्णतामान १०५ अंश फॅरनहाइट) मळमळ, डोकेदुखी, धाप लागणे, धडधड होणे, गोंधळ उडणे, मूच्र्छा येणे, शरीराची निश्चेष्ठता.
काळजी कशी घ्याल?
उन्हाळ्यात होणारे वरील सर्व आजार आणि प्रामुख्याने होणारा उष्माघाताचा त्रास आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यायला हवी. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागतं, तेव्हा शक्यतोवर उन्हात बाहेर फिरणं टाळावं. विशेषत: सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. बाहेर जाण्याचे टाळणे शक्य नसल्यास मात्र खालील बाबींवर लक्ष द्यावं -
भरपूर प्रमाणात पाणी प्यावं
उन्हाळ्यात तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, निंबूपाणी तसेच ओआरएस पावडर घ्यावी अथवा जवळच बाळगावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेत. त्यामुळे खरोखरच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळा. ज्यामुळे पोटपेटके सुरू होतात. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यकच आहे, मात्र व्यायाम करताना थोडी जास्त काळजी घ्यावी. व्यायामाच्या दोन तास आधी सामान्यत: २४ टक्के द्रवपदार्थ घ्यावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी ८ टक्के द्रवपदार्थाचं सेवन करावं.
खाण्याच्या सवयी
ताजी फळं तसंच फळभाज्यांचा वापर करावा. गरम तसंच जड अन्नपदार्थ टाळावेत. कारण ते शरीराचे तापमान वाढवतात. टरबूज, द्राक्षं, अननस, गाजर व काकडी खावी. कच्चा कांदा जेवणात असल्यास उत्तम. जेवणामध्ये गरम मसाले, लाल पावडर व मिरची मसाला वापरणे शक्यतो टाळावं. कारण त्यामुळे शरीरातली उष्णता वाढण्यास हातभार लागतो. तसंच तेलकट व तिखट खाणं टाळावं.
उन्हाळ्यात घालायचा पेहराव
शक्यतोवर हलके, फिकट रंगाचे सैल कपडे परिधान करावे. गडद रंगाचे कपडे घालू नये. जमल्यास पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. कारण गडद रंग तुलनेने जास्त उष्णता शोषून घेतो. जमल्यास टोपी किंवा स्कार्फ वापरावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरावेत.
त्वचेची घ्यावयाची काळजी
त्वचा सजलित ठेवावी तसंच मॉईश्चराझरचा वापर करावा. बाहेर जावंच लागलं तर स्कार्फ (मुली) तर टोपी (मुले)चा वापर करावा. छत्रीचा वापर करावा. बाहेर जाण्यापूर्वी तीस मिनिटं आधी सनस्क्रीन लोशन लावावं. तसंच ते पॅकेटवरील दिलेल्या सूचनेबरहुकूम वापरावं.
घरात काय बदल कराल
दारं व खिडक्या बंद ठेवावीत. घरातील पडदे गडद रंगाचे नसावेत. खिडक्यांच्या काचा गडद रंगांच्या असाव्यात. म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही. खिडक्या रात्री उघडय़ा ठेवाव्यात आणि घरात हवा खेळती ठेवावी. घराच्या आजूबाजूला झाडे असावीत. हिरवळ असावी जेणेकरून वातावरण थंड राहण्यास मदत होते.
डासांच्या उपद्रवासंबंधी घ्यायची काळजी
डासांची प्रजनन ठिकाणी म्हणजे घरातील व बाहेरील सांडपाणी तुंबून राहिलेली ठिकाणं, घरातील कुंडय़ांमधील पाणी यासारखी ठिकाणं स्वच्छ ठेवावीत. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डासांना दूर ठेवण्यासाठीच्या औषधांचा, स्प्रेचा वापर करावा. जेणेकरून डासांपासून प्रादुर्भाव होणारे आजार टाळता येतील.
पाण्यात होणा-या जंतूंचा प्रादुर्भाव आणि त्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
= पाश्चराईज्ड दूध आणि उकळलेलं पाणी वापरावं. उष्णतेमुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात.
= हात स्वच्छ धुवावेत.
= घरात शिजवलेले अन्नपदार्थ खावेत.
= शिळे अन्न खाऊ नये.
= लहान मुलांना शक्यतोवर बाटलीमधून दूध देऊ नये.
उष्माघातावर त्वरित उपचार कसा कराल?
आपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला तर त्वरित दवाखान्यात नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला (९११ ला) फोन करावा आणि मध्यंतरीच्या काळात पुढीलप्रमाणे प्रथमोपचार करावेत.
= सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावं आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्णतापमान कमी होण्यास मदत होते.
= शरीराला ओल्या कपडय़ाने पुसून काढावं आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.
= जवळ बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरुवात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.
= उन्हामुळे नाकातून रक्तस्रव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसल भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्रव थांबतो.
= व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावं वा बर्फ टाकावा.
= व्यक्तीला मूच्र्छा आली असेल तर श्वसनक्रियेची तपासणी करावी.
= व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याला पाणी पिण्यास द्यावं.

Read More »

मिश्र चवीचं स्टार फ्रूट
कित्येकदा गाडय़ांवर आपल्या चांदणी किंवा स्टारच्या आकाराचं एक फळ दिसतं. हे फळ 'स्टार फ्रूट' म्हणून ओळखलं जातं. स्टार फ्रूटचं इंग्रजीतलं नाव 'कॅरमबोला' तर मराठी 'करमळा' म्हणून ओळखलं जातं. या फळाचा आकार चांदण्याप्रमाणे असल्यामुळे याला 'स्टार फ्रूट' असं म्हटलं जातं.
चवीला हे आंबट-गोड असतं. याची लागवड पूर्व आशिया, चीन आणि पॅसिफिक बेटं या ठिकाणी म्हणजे गरम, दमट, उष्ण प्रदेशीय ठिकाणी चांगली होते. याचा रंग फिकट हिरवा किंवा पिवळा असून त्याची साल मेणासारखी चकचकीत असते.
याचा आकार दोन ते सहा इंच इतका असतो. या एका फळात कॅलरी, काबरेहायड्रेट, साखर, फायबर आणि प्रथिनं असतात.
  • या फळाची मेणासारखी दिसणारी साल ही शरीराला आवश्यक असणा-या फायबरचं प्रमाण वाढवतं. जेणेकरून आतडय़ातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलचं शोषण करून त्यांच्या वाढीला प्रतिबंध करण्यास मदत करते.
  • 'सी' जीवनसत्त्वाचा चांगल्या प्रकारे भरणा असतो. त्यामुळे यात नैसर्गिकरीत्या अँटिऑक्सिडंटचं काम करतं. अशा फळाचं सेवन केल्यामुळे प्रतीकारशक्ती विकसित होते.
  • याशिवाय हे फळ 'बी' जीवनसत्त्वाचा उत्तम स्रेत आहे. यामुळे चयापचय क्रिया सुधारते.
  • केसांचं गळणं थांबून वाढही चांगली होते.
  • याच्या पानाच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोटात होणारे अल्सर बरे होतात.
  • कफ, ताप, घसा खवखवणे किंवा घशाला सूज येणे या विकारांपासूनही आराम मिळतो.
  • बी-९ या जीवनसत्त्वाचं प्रमाण अधिक असल्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

Read More »

फळांचा राजा खुलवणार सौंदर्य
आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या.

खाण्याचं व्यसन लागेल अशी चव असणारा, अमृताची आठवण करून देणारा आंबा आणि सर्वश्रुत असलेला फळांचा राजा आता बाजारात बराच जोर धरत आहे. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आंब्याच्या अनेक प्रजाती आढळतात.
हापूस आंबा, पायरी, तोतापुरी, राजापुरी, लंगडा आंबा, बारमाही आंबा असे कितीतरी आंब्याचे प्रकार कोकणात गेल्यावर कळतात. बाळ कै-या, कै-या व आंबा यांपासून आपण आतापर्यंत लोणची, पन्हं, गुळांबा, मोरांबा, छुंदा, आमरस इत्यादी पदार्थ बनवले आहेत. आमरस विशेष पद्धतीने आटवून ठेवून त्याच्या वडया आणि बर्फीही करता येतात. आंब्यामुळे वजन वाढतं, स्नायू मजबूत होतात, प्रकृती चांगली राहते.
आंबा स्वयंपाकघरात आणि वैद्यकीय क्षेत्रात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेह-यावरचा कोरडेपणा जातो. चेह-यावरच्या सुरकुत्या जाऊन चेहरा स्वच्छ होतो. अकालीन वृद्धापकाळामुळे झालेल्या निस्तेज त्वचेसाठी आंब्याचा वापर केला जातोय.
उन्हामुळे त्वचेमध्ये गरजेपेक्षा जास्त ओलावा व चिकचिकीपणा निर्माण होतो व तजेलदारपणा नष्ट होतो. अशा वेळेस नेहमीच पार्लर ट्रिटमेंट करणं सोयीचं होत नाही. नैसर्गिकरीत्या केलेले उपचार हे फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे असतात. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. अशा या आंब्यापासून घरच्या घरी फेसपॅक कसे तयार करायचे ते पाहू या.
 »  आंब्यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं प्रामुख्याने आढळून येतात. शिवाय 'ब' जीवनसत्त्व, अल्फा हायड्रोक्सी अ‍ॅसीड व पोटॅशिअम यांचं प्रमाण कमी-अधिक प्रमाणात असतं.
» आंब्यातील 'अ' जीवनसत्त्वामुळे चेह-यावरील तेलकटपणा जाऊन चेहरा टवटवीत दिसतो व सुरकुत्या नष्ट होतात. » 'ब' जीवनसत्त्व चेह-यावरील ताजेपणा आणण्यासाठी उपयोगात येतो. अल्फा हायड्रोक्सी अ‍ॅसीडमुळे मृत पेशी नष्ट होतात. त्यामुळे चेहरा नरम व निखळ दिसतो.
» 'क' जीवनसत्त्व पांढरे संयोजक पेशी जलातील प्रथिन घटक वाढवण्यास मदत करतात.
»  पोटॅशिअममुळे चेह-यातील निस्तेज त्वचा सुधारते, कोरडया त्वचेवर ओला थर निर्माण होऊन चेहरा निखळतो.
आंब्यापासून केले जाणारे फेस पॅक
हायड्रेटिंग फेस पॅक
उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.
संवेदनशील त्वचेसाठी
काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.
ताजे मँगो फिल्टर
संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.
तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने  धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.
मँगो बॉडी स्क्रब
चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.
डागविरहीत त्वचेसाठी
आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.
मँगो फेशिअल
चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.
१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.

Read More »

तांब्याच्या भांडयातलं पाणी आरोग्यदायी
पाण्याला जीवन संबोधलं जातं, म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनाशेपोटी व तांब्याच्या भांडयात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपरिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मात्र या पाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेऊ या.

आयुर्वेदिक महत्त्व
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांडयात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कप, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ ते १० तास तांब्यांच्या भांडयात ठेवलेलं पाणी नियमित प्यावं. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी र्निजतुक होतं व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात समाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या ज्या लोकांना असते त्यांनी पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकून ते पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी उत्तम असते.
१) पचन संस्थेला चालना
पित्त, अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होण्यासाठी तांब्याच्या भांडयात ठेवलेलं पाणी पिणं अत्यंत हितकारी असतं. तांब्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे पोटातील जीवाणूंचा नाश होतो. तांब्यांच्या भांडयात ठेवलेलं पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो. तसेच पोट साफ होण्यास मदतही होते.
२) वजन कमी करण्यास मदत
तेलयुक्त पदार्थ, परिपूर्ण भाज्या, फळं आणि वजन घटवण्यास तांब्याच्या भांडयातील पाणी फारच उपयोगी पडते. शरीरातील आवश्यक घाम शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक घाम बाहेर टाकण्यास मदत होते.
३) जखमा भरून काढण्यास मदत होते
तांब्याच्या भांडयात ठेवलेलं पाणी अ‍ॅन्टिबॅक्टेरिअल तसेच अ‍ॅन्टिवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते, तसंच नवीन पेशींची निर्मिती होऊन शरीराच्या आतील जखमा विशेषत: पोटातील जखमा तांब्यामुळे लवकर भरण्यास मदत होते.
४) चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात
चेह-यावर अकाली पडणा-या सुरकुत्यांमुळे काही लोक विशेषत: मुली, स्त्रिया खूप चिंतित असतात, मग पार्लर, वगैरे जाणे याकडे विशेष लक्ष देतात. तांब्याच्या भांडयातील पाणी प्यायल्याने नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते व चेह-यावर नवीन त्वचेची निर्मिती होते.
५) हृदयरोग व रक्तदाब यासारखे आजार
तांब्याच्या भांडयातील पाण्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या सुरळीत होतात.
६) कर्करोगाशी सामना
आजकालच्या जीवनामध्ये कर्करोग हा सगळीकडे मोठया प्रमाणात पसरणारा भयावह आजार आहे. तांब्यामध्ये एवढी क्षमता आहे की, कर्करोगासारख्या भयावह आजारावर मात करू शकतो.
७) सांधेदुखी
तांब्याच्या भांडयात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने संधीवाताच्या त्रासाने होणारी सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर हाड मजबुतीसाठी तांब्याच्या भांडयातील पाणी फायदेशीर असतं.
८) थायरॉइड
तांब्याच्या भांडयातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिजन हार्मोन्स संतुलित राहतं. तांब्यातील खनिज थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉइडच्या आजारापासून आराम मिळतो.

Read More »

पाचक ब्ल्यूबेरी
ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ म्हणून ओळखलं जातं. याची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते.

ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ म्हणून ओळखलं जातं. याची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. मात्र आपल्याकडेही आता हे फळ काही नवीन राहिलेलं नाही.
विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असतं. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर', त्याची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो.
फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बीदेखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात.
» मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं.
»  दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं.
» त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण     कमी होतं.
» मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते.
» उच्च रक्तदाब आणि रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते.
यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते.
»  डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
» शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते.
» पचनक्रिया सुधारते.
» बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं.

Read More »

उन्हाळ्यासाठी खास जलजिरा
उन्हाचा तडाखा वाढतोय. रखरखत्या उन्हातून फिरताना आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

उन्हाचा तडाखा वाढतोय. रखरखत्या उन्हातून फिरताना आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन, भोवळ येणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करणारे गारेगार जलजिरा सरबत उत्तम आहे. कारण त्यामुळे पचन सुधारते. असं हे शरीराला थंड ठेवणारं जलजिरा कसं करायचं हे पाहू या.
साहित्य- एक चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा पुदिन्याची पेस्ट, अर्धा चमचा कोथिंबिरीची पेस्ट, एक चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस, एक ग्लास थंड पाणी, चवीपुरता मीठ
कृती – सगळं साहित्य थंड पाण्यात एकत्र करून घ्यावं. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. सजावटीसाठी त्यात कोथिंबीर आणि पुदीना घालावा. असं हे जलजिरा सव्‍‌र्ह करा.

Read More »

उन्हाळ्यातही राहा थंडगार
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. पण या वातावरणाशी जुळवून घेताना आपण काय बदल केले पाहिजेत हे जाणून घेऊया.

सध्या मुंबईचा पारा प्रचंड वाढला आहे. या हॉट वातावरणामुळे सगळेच हैराण झालेले आहेत. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाने आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
उन्हाच्या तडाख्यामुळे जीव अगदी कासावीस होतो. उन्हामध्ये प्रचंड प्रमाणात येणारा घाम, उकाडा, चिकटपणा यामुळे सगळेच खूप त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशा वेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्याची गरज प्रत्येकालाच भासते. या हॉट वातावरणात कूल राहण्यासाठी पुढे काही उपाय दिले आहेत. ते करून बघा.

सुती कपडयांचा वापर
उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडयांचा वापर करावा. जेणेकरून सुती कापड उष्णता शोषून घेईल. तसेच हे कपडे सैल व सुटसुटीत असावेत. उकाडयात कॉलेजिअन्ससाठी जीन्सऐवजी लेगीन्सचा पर्याय उत्तम आहे. घट्ट कपडे टाळावेत. नायलॉन आणि सिंथेटिक कपडे घालणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण नायलॉन कापड अंगाला आलेल्या घामाला चिकटतं त्यामुळे घामाचा ओलावा कायम राहतो. आणि ते आपल्या शरीराला त्रासदायक ठरते.
भरपूर पाणी प्या
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला भरपूर तहान लागते. तहान भागवण्यासाठी खूप पाणी पितो. भरपूर पाणी पिणं हे उत्तमच आहे. पण काही वेळा त्याचा जेवणावर परिणाम होतो. आपली भूक मंदावते. या काळात दिवसातून बारा ग्लास पाणी प्यावं. उकाडयातून घरी थकूनभागून आल्यावर लगेच पाणी पिणं नेहमी टाळावं. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मगच आरामात बसून पाणी प्यावं.
शीतपेयांचा अतिवापर टाळा
आजच्या फास्ट जीवनशैलीमध्ये कोला, सोडा तसेच विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स ही शीतपेयाचा अविभाज्य अंग झालेली आहेत. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आपण पटकन एखादी शीतपेयाची बाटली काढून तोंडाला लावतो. परंतु कधीतरी हे शीतपेय पिणं ठीक आहे. रोजच व्यसन लागल्याप्रमाणे त्याचं सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी, ताक इत्यादी प्यावं. त्यामुळे शरीराला स्फूर्ती येते आणि ऊर्जाही मिळते.
उन्हाळ्यातला आहार
बाहेरच्या पदार्थाची चव आपल्या जीभेवर नेहमीच असते. परंतु उन्हाळ्यात शक्यतो बाहेरचे पदार्थ टाळा. कारण त्यामुळे फुड पॉयझन अर्थात अन्नातील विषबाधा होते. शिवाय कावीळ, टायफॉइड, कॉलरा व अतिसार अशा रोगांना आमंत्रण मिळतं. रोजच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं. रोज शरीराला पौष्टिक घटक आणि पोषक तत्त्वं मिळत आहेत की नाहीत याकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिळे अन्न टाळावं. जड आणि तिखट मसालेदार-तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं.
स्नायूंची काळजी घ्या
उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने घाम येतो. आणि आपल्या शरीरातले द्रवाचं प्रमाण झपाटयाने कमी होते. त्यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांची कमतरता निर्माण होऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावा. काही वेळा पाणी प्यायल्यानेसुद्धा पेटक्यांना आराम मिळतो.
उन्हापासून त्वचा सांभाळा
सूर्याची अतिनील किरणं त्वचेला घातक ठरतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना चेह-यासाठी स्कार्फचा वापर करावा. उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकून अंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी योग्य अशा सनस्क्रीमची निवड करा.
घरातून बाहेर निघताना २० ते ३० मिनिटं अगोदर सनस्क्रीम लावा. त्वचेला रोगमुक्त ठेवण्यासाठी दररोज दोन वेळा क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करण्याची सवय लावावी. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असू द्या. त्वचेचा रंग सावळा होत असेल तर कच्चा टोमॅटो कुस्करून त्यात ताक मिसळून चेह-याला लावल्याने थंडावा मिळतो.
डोळ्यांची काळजी घ्या
उन्हात नेहमी २ ते ३ तासानंतर डोळ्यांवर गार पाणी मारावं. दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या फोडी ठेवाव्यात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं डोळ्यांवर दुधाच्या पट्टया ठेवाव्यात. तसंच घरातून बाहेर पडताना गॉगल लावणं हितावह ठरेल.
केसांची निगा राखा
उन्हाळ्यात केस कोरडे होतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि हेअरस्टाईल बनवणा-या उपकरणांपासून दूरच राहा. याशिवाय मेंदी कंडिशनरचं काम करत असल्याने केसांचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी १५ दिवसांनी मेंदी लावावी. तसंच आठवडयातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर करावा.
आजारापासून मुक्त राहा
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आजारापासून संरक्षण करायचे असेल किंवा अंगाला खाज सुटत असेल तर खरबूज हा उत्तम पर्याय आहे. कारण खरबूजमध्ये १५ टक्के पाण्यासोबत व्हिटॅमिन्सचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते.
उन्हाळ्यात ताप किंवा डोकं दुखत असेल तर औषधं स्वत:हूनच घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक औषधे घेणं केव्हाही चांगलं. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टया ठेवल्यास अधिक आराम मिळतो. उन्हाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे पाण्याची कमतरता, प्रदूषित अन्न, दूषित पाणी इत्यादी. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.
वातावरण प्रसन्न ठेवा
ऑफिस किंवा घरातल्या खिडक्या स्लाइड्सने किंवा पडद्याने झाका, मात्र हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. डेस्कवर एक छानसा फ्लॉवरपॉट ठेवावा. जेणेकरून मनाला प्रसन्नता मिळेल. ब-याचदा ऑफिसमध्ये जास्त लाईट्स लावले जातात. पुरेसा प्रकाश ठेऊन अतिरिक्त लाईट्स बंद ठेवा. डेस्कवर एखादं सुखद, तजेलदार निसर्गचित्र लावून ठेवा. त्यामुळे मानसिकदृष्टया ताजेतवानं राहण्यास मदत होईल.

Read More »



मधुर रासबेरी
चवीला मधुर, दिसायला तेजस्वी आणि लाल रंगाची रासबेरी आपल्याकडे भारतातही लोकप्रिय आहे. मूळची युरोपात असली तरी पोलंड, अमेरिका, जर्मनी आणि चिली आदी ठिकाणी रासबेरीची लागवड होते.

चवीला मधुर, दिसायला तेजस्वी आणि लाल रंगाची रासबेरी आपल्याकडे भारतातही लोकप्रिय आहे. मूळची युरोपात असली तरी पोलंड, अमेरिका, जर्मनी आणि चिली आदी ठिकाणी रासबेरीची लागवड होते. हे फळ दिसायला बोरासारखं असून चवीला स्ट्रॉबेरीसारखं असतं. त्यात एक बीदेखील असते. अशा या फळात खनिजं आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांचा समावेश आहे. अशा या आरोग्यसंपन्न फळाविषयी जाणून घेऊया.
» यात उष्मांक आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण कमी असलं तरी डाएटरी फायबर आणि अँटिऑक्सिडंटचा त्यात भरपूर समावेश असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते.
» अँटिऑक्सिडंटची संयुगं असल्याने हे फळ कर्करोगापासून दूर ठेवतं.
»  रक्तातील साखरेचं अतिरिक्त प्रमाण शोषून घेतल्यामुळे मधुमेहींसाठी या फळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं.
»  यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांब, लोह आदी घटकांचं प्रमाण अधिक असल्यामुळे हृदयाच्या विकारांपासून लांब राहतो. तसंच तांबं असल्यामुळे लाल रक्तपेशींचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
»  गर्भधारणेसही अतियश उपयुक्त असून त्यामुळे मिस्कॅरेज होण्याची शक्यता धूसर होते.
»  नियमित सेवनाने पायात पेटके येण्यापासूनही आराम मिळतो.
»  त्वचेचा पोत सुधारून वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यास मदत करते.
»  यात जीवनसत्त्व ब आणि फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश असल्यामुळे डिप्रेशनपासून मुक्तता मिळते.

Read More »

फळांचा राजा आंबा
आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला 'कोकणचा राजा' असं म्हणतात. एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आहे.

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला 'कोकणचा राजा' असं म्हणतात. एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आहे. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं.
आंब्याला भारताच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचं 'राष्ट्रीय फळ' तर बांगलादेशचं 'राष्ट्रीय झाड' आहे आणि फिलिपाइन्सचं 'राष्ट्रचिन्ह' आहे. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत. कच्च्या आंब्याला 'कैरी' असं म्हणतात, कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो.
ज्या बाजूला ऊन लागेल त्या बाजूला लाल रंग तर जी बाजू सावलीत असते तिथे पिवळसर रंग दिसतो. फळाच्या मध्यभागी चपटया, मध्यम आकाराची आणि लांबट कोय असते. आंबा हा वृक्ष सदारहित असतो. हे झाड अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका आहे.
संस्कृतमध्ये 'आम' तर तमीळ भाषेत 'मानके' किंवा 'मानगास', इंग्रजीत 'मँगो' म्हणतात. आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.
»  कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब आदी विकारांवर आराम मिळतो.
»  कोयीचे वाळलेले तुकडे चावून खाल्ल्यास आवेचे जंत नष्ट होतात.
»  ज्यांना गाडी, बस किंवा रेल्वेतून प्रवास करताना उलटी होते त्यांनी प्रवासादरम्यान आंब्याची पानं चघळावीत.
»  केसांत कोंडा किंवा खाज येत असेल त्यांनी आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी उकळून ते तेल टाळूला लावावं.
»  आंब्याच्या झाडाची आंतरसाल चघळल्याने दात बळकट होतात.
»  आंब्याची पानं सकाळी उठून चघळल्याने हिरडया मजबूत होतात. तसंच दातातून येणारं रक्त थांबतं.
»  नाकातून रक्त येणे, संडासवाटे रक्त जाणे, डोळ्यांची आग होणे, फुप्फुसे, आतडी, गर्भाशयातून रक्त वाहणे, अंगावरून पांढरं जाणं अशा रक्तपित्ताचा त्रास असलेल्यांनी आंब्याच्या आंतरसालीचं चूर्ण किंवा काढा सेवन करावा. आराम पडतो.
»  आंब्याची पानं चार कप पाण्यात उकळून ते पाणी एक कपभर आटवावं. हे पाणी गाळून बाटलीत ठेवावं. आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप्स म्हणून वापरावं. म्हणजे डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, सूज येणे, धूसर दिसणे, डोळे थकणे, रांजणवाडी आदी विकारांवर हे थेंब डोळ्यांत घातल्यास आराम पडतो.
»  कोवळ्या पानांचा लेप करून त्वचाविकारांवर लावल्यास आराम पडतो.
»  आंब्याच्या कोयीचं चूर्ण मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्यांवरही गुणकारी आहे.
»  आंब्यात चरबी, सोडियम आणि कोलेस्टेरॉल नसतं. तसंच जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, आणि केचं प्रमाण असतं. बी जीवनसत्त्व आपल्या शरीरात साठवून ठेवलं जात असल्याने सीझनमध्ये खाल्लेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरीरात केली जाते.
» आंब्याच्या रेषायुक्त तंतूमध्ये डाएटरी फायबर्सचं प्रमाण अधिक असतं. म्हणूनच आंबा चोखून आणि रेषांसकट खावा.

Read More »