Tuesday, February 10, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

योग्य न्याहारी योग्य वेळी

उत्तम आरोग्य आणि उत्तम सौंदर्य हवं असेल तर व्यायामाबरोबर योग्य आहाराचीही गरज असते. योग्य वेळी योग्य पद्धतीचा आहार घेतल्याने आरोग्य अबाधित राहते. त्या आहारात न्याहारीलादेखील महत्त्व आहे. म्हणून नेमकी न्याहारी कशी असावी हे जाणून घेऊया.

सकाळची न्याहारी भरपूर करावी, असं आपल्याला कित्येकदा डॉक्टरांकडून सांगितलं जातं. जी मंडळी हेल्थ कॉन्शिअस आहेत त्यांच्या डाएटमध्येदेखील सकाळच्या न्याहारीला महत्त्व दिलं आहे. कारण सकाळी न्याहारी व्यवस्थित असेल तर दिवसभराच्या कामासाठी आपल्याला ऊर्जा मिळते, स्मरणशक्ती सुधारायला मदत होते, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं.

म्हणूनच सकाळची न्याहारी उत्तम असली पाहिजे. सकाळी न्याहारी केली नाही तर यापैकी कोणतीही गोष्ट होत नाही. म्हणूनच या न्याहारीत कोणते पदार्थ असावेत आणि त्याचा शरीराला काय उपयोग होतो याची माहिती घेऊया.
चीझचा एक तुकडा + एक कापलेला टोमॅटो + एक कप ग्रीन टी

यातून साधारण २५० कॅलरीज मिळतात. चीझमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं आणि टोमॅटो हे अँटिऑक्सिडंटचं आणि फायबरचं काम करतं. तर ग्रीन टीचं सेवन केल्यामुळे आपल्या मनावरचा मानसिक ताण कमी होतो.
एक सफरचंद + मूठभर ड्रायफ्रुट्स +एक ग्लास दूध

सफरचंदामुळे त्वरित ऊर्जा मिळते तर ड्रायफ्रुट्स रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत करतात. आणि दुधामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अशा प्रकारच्या न्याहारीतून २०० कॅलरीज मिळतात.
ब्राऊन ब्रेड आणि अंड + एक ग्लास दूध

दिवसाच्या सुरुवातीलाच अंडं खाल्ल्याने दीर्घकाळ तुम्हाला भूक लागत नाही. म्हणजे त्यामुळे तुम्ही बाहेरचे पदार्थ सेवन करत नाही. कारण यातून शरीराला आवश्यक असलेली पोषणतत्त्व आणि प्रोटिनही मिळतं. तर ब्राउन अर्थात गव्हापासून तयार केलेल्या पावामुळे डाएटरी फायबर मिळतात, जे शरीराला पाचक असतात आणि त्यामुळे वजनही वाढत नाही.

उकडलेली कडधान्य + ब्रेडचा एक टोस्ट + एक ग्लास भाज्यांचा ज्यूस
यामुळे २५० ते ३०० कॅलरीज मिळतात. कारण उकडलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात पोषणतत्त्व असतात. त्यातून मोजक्याच; पण अशा कॅलरीज मिळतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभरात अशक्तपणा जाणवत नाही.

मुसली (एक कप ओट्स, ताज्या फळांचे तुकडे, कडधान्य आणि ड्रायफ्रुट्स यांचं एकत्रित केलेलं मिश्रण) + एक कप दही
ही मुसली तुम्हाला बाजारात मिळते. ही दुधातून घेतल्यास त्यातून २०० कॅलरीज प्राप्त होतात. कारण मुसलीतून शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीज मिळतात. तसंच त्यातून फायबर मिळतं तसंच आपली पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राखते. याबरोबर दह्याचं सेवन केल्यामुळे भरपूर जीवनसत्त्वं मिळतात.

भाजलेलं धान्य + दही
यातून २५० कॅलरीज मिळतात. कारण यात भरपूर प्रमाणात फायबरचं प्रमाण असतं. भाजलेल्या धान्याचं सेवन केलं तर भूक लागत नाही. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसंच त्यामुळे हाडं मजबूत होतात. तसंच पचनशक्ती सुधारते.

भाज्यांचं सूप
साहित्य : एक कप सालं काढून कापलेली काकडी, एक कप मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो, एक कप कापलेलं गाजर, एक कप दुधीचे तुकडे, एक कप बिटाचं साल काढून केलेले तुकडे, चार आवळे, एक चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर किंवा पुदीना (आवडीनुसार), एक चमचा हळद, दीड चमचा काळं मीठ आणि दीड चमचा जिरं पावडर.

कृती : सगळ्या भाज्यांचे तुकडे एकत्रित करून मिक्सरवर बारीक करून घ्यावेत. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, जिरं पावडर आणि काळं मीठ घालावं. चांगलं ढवळावं. त्यावर कोथिंबीर किंवा पुदीना घालून सव्‍‌र्ह करा.

पालक, बीट आणि टोमॅटो
साहित्य : १५ ते २० पालकाची पानं, एक मध्यम आकाराचं बीट, २ टोमॅटो, लिंबू, मीठ, चवीनुसार मिरीपूड
कृती : सगळं साहित्य एकत्रित करून मिक्सरला वाटून घ्यावं. त्यात पाणी आणि मिरपूड घालून सेवन करावं.

दुधीचं सूप
साहित्य : अर्धा किलो दुधी, एक ग्लास पाणी, मीठ, सैंधव मीठ आणि सजावटीसाठी पुदीन्याची पानं,
कृती : पाणी घालून दुधी शिजवून घ्या. नंतर तो गाळून त्यात मीठ आणि सैंधव मीठ घाला. पुदीन्याची पानं घालावीत.

आवळ्याचं सरबत
साहित्य : अर्धा कप आवळ्याचा रस, दीड कप गूळ, अर्धा कप मध, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ किंवा सैंधव चवीनुसार.
कृती : आवळा, गूळ आणि मध एकत्रित करून घ्यावा. गूळ विरघळेपर्यंत ढवळा, नंतर त्यात पाऊण कप पाणी घाला. एकत्रित ढवळून त्यात जिरंपूड,२ मीठ किंवा सैंधव मीठ घालून सव्‍‌र्ह करा.

Read More »

बहुगुणी पीच

प्रुनस पर्शिया असं शास्त्रीय नाव असलेले पीच हे असं फळ आहे की त्यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. प्रामुख्याने उन्हाळ्यात मिळणारं हे फळ रात्रीच्या जेवणानंतर सेवन केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. सफरचंदाप्रमाणे दिसणारं हे फळ पांढरा आणि पिवळा अशा दोन रंगांमध्ये येतं. चवीला रसदार असून त्याची त्वचा मऊ असते. याचे फायदेही भरपूर आहेत ते जाणून घेऊया.

ए, सी, ई आणि के नावाच्या जीवनसत्वांचा यात भरपूर समावेश आहे. ज्यामुळे तुमची दृष्टी उत्तम होते, तुमची पचनशक्ती सुधारते. रक्तातील गुठळ्या यामुळे होत नाही.

यात डाएटरी फायबरचं प्रमाण अधिक असून खाल्लेल्या पदार्थाचं पचन होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

आपल्या शरीरात दिवसभरात कितीतरी टॉक्सिनचा समावेश होतो. या टॉक्सिनमुळे शरीराला हानी पोहोचू शकते. मात्र जेवणानंतर पीचचे सेवन केल्यास यातील पोटॅशिअममुळे टॉक्सिनचा नाश होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

नियमित सेवनाने कर्करोगापासून संरक्षण होते.

त्यात असलेल्या पोषणमूल्यांमुळे त्वचेचा पोत सुधारतो.

शरीरावर सूज असल्यास किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी पीचचे सेवन करायलाच हवं.

नियमित सेवनामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते.

Read More »

तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यास घातक!

मोबाईल फोन्स असो वा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप.. आपल्याला या तंत्रज्ञानाची सवय झाली आहे. त्यामुळे कामं सोपी होऊ लागली आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीचा अतिरेक चांगला नाही, त्याप्रमाणे या गोष्टीचा वापरही आपल्या आरोग्यास धोका पोहोचवत असल्याचं समोर आलं आहे.

वायरलेस इंटरनेट आणि स्मार्टफोन्सचा वापर करून आपल्या लोकांनी कशासाठीही, केव्हाही, कुठेही, नेहमी संपर्कात राहणे-कधीही इतकंसोपं किंवा सोयीस्कर नव्हतं. पण आता परिस्थिती अशी आहे की फोन नसेल तर आपल्याला चुकल्यासारखं होतं. मोबाईलच नव्हे तर एकूणच तंत्रज्ञानाच्या आपण आहारी गेलेलो आहोत असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही.

मात्र यामुळे आपलं काम कितीही सोपं होत असलं तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे एका चांगल्या बाजूबरोबर वाईट बाजूही असते. संशोधन म्हणतं की युनायटेड स्टेट्सच्या तुलनेत, सेल्युलर टॉवर्स आणि मोबाईल फोन्सपासून होत असलेल्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाशी एका सामान्य भारतीय माणसाला होणा-या संसर्गाची पातळी ५-१० पट जास्त आहे.

किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे होणा-या नुकसानांमध्ये डीएनएची हानी, स्वत:ची दुरुस्ती करण्यात असमर्थ ठरणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, मेलाटोनीन पातळी कमी होणे, पेशींना हानी पोहोचवणे आणि यांसारख्या इतर बाबींचा समावेश आहे असे या क्षेत्राच्या संशोधनात आढळून आलं आहे. उत्सर्जनाच्या पेशींकडे आकर्षित होण्यामुळे शुक्राणू, ओव्हरी आणि वाढत्या गर्भास सर्वात जास्त हानी पोहोचते. परिणामी कर्करोग, नव्‍‌र्हस डिसऑर्डर आणि अगदी वंध्यत्वदेखील येऊ शकतं.

क्लिनिकल डेटाप्रमाणे सुमारे १५ टक्के भारतीय जोडपी वंध्यत्वाच्या कुठल्या तरी स्वरूपाने पीडित असतात. संशोधनात असं देखील कळून आलं आहे की, पुरुषांमध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे शुक्राणूंची संख्या, त्याची हालचाल तसेच त्यांच्या शब्दरचना शास्त्रावरदेखील प्रभाव पडू शकतो. गरोदर स्त्रिया व त्यांच्या गर्भस्त अर्भकावरही सेल्युलर किरणोत्सर्गाचा प्रभाव पडू शकतो असंही संशोधनात आढळून आलं आहे.

गरोदरपणाच्या सरत्या काळात किरणोत्सर्गाच्या संर्सगामुळे अर्भकाच्या पाठीच्या कण्यास इजा होऊ शकते. बहुतेक मोबाईल्समधून ८२५ आणि ९१५ मेगाहर्ट्ज (टऌ९)च्या मध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सीची देवाण-घेवाणही होत असते. या रेडिओ तरंगाचे उत्सर्जन मोबाईल हँडसेट व बेस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणांहून होते. ज्याप्रमाणे मायक्रोव्हेवमध्ये खाद्यपदार्थाना गरम करण्याची क्षमता असते तशीच रेडिओ फ्रीक्वेन्सीमध्ये मानवी स्नायूंना उष्णता प्राप्त होते.

रेडिओ तरंगांमुळे निर्माण झालेल्या विद्युतचुंबकीय क्षेत्राद्वारे उत्पन्न होणा-या थर्मल (औष्णिक) प्रभावामुळे शरीराच्या ध्रुवीय परमाणूमध्ये डायइलेक्ट्रिक उष्णता निर्माण होते, ज्यामुळे जिवंत पेशी मरून जातात.
ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनने आयोजित केलेल्या एका अध्ययनाद्वारे हे स्पष्ट झालं आहे की सेलफोन टॉवरच्या १०० मीटरच्या परिसरात राहाणा-या स्त्रियांमध्ये जास्त मानसिक ताण व वंध्यत्वाची दुप्पट शक्यता असते.

गर्भधारणेच्या प्रयत्नांत असलेल्या स्त्रियांमध्ये, त्यांच्या लाळेतील प्रोटिनच्या (अल्फा-अमाईलेज) पातळीवरून त्यांच्या मानसिक तणावाचे आकलन केलं जातं. अध्ययनानुसार, ज्या स्त्रियांच्या लाळेमध्ये या प्रोटिनची पातळी उच्च होती त्यांच्यात ही पातळी कमी असलेल्या स्त्रियांच्या तुलनेत गर्भधारणेची शक्यता २९ टक्के कमी होती.

कॉर्डलेस फोन्समधूनदेखील मोबाईल फोन्ससारखेच उत्सर्जन होत असते. तथापि, काही तज्ज्ञांच्या मते हे मोबाईल फोन्सपेक्षाही जास्त धोकादायक असतात. असे मत असण्याचं कारण असं की, कॉर्डलेस फोन स्टेशन्समधून मोबाईल फोन टॉवरप्रमाणेच उत्सर्जन होतं, आणि त्यांच्या मॉडेलला अनुसरून काही वेळा तर हे उत्सर्जन मोबाईल फोन टॉवर उत्सर्जनाच्या दुप्पट असतं. कॉर्डलेस फोनच्या बेसमधून होणारा किरणोत्सर्ग सहा व्होल्ट दर मीटर अशा प्रमाणाचा असतो- जे १०० मीटरच्या अंतरावर असलेल्या मोबाईल फोन टॉवरपेक्षाही दुप्पट जास्त असते.

कॉर्डलेस फोन बेसपासून दोन मीटर अंतरावर असूनदेखील तुम्हाला २.५ व्होल्ट दर मीटरप्रमाणे रेडिएशन मिळेल, जे वैज्ञानिकांच्या मते, सुरक्षित पातळीच्या ५० पट जास्त असते. म्हणजे तुमच्या ऑफिस व घरामध्ये कॉर्डलेस न ठेवणे हाच कॉर्डलेस फोनच्या उत्सर्गापासून सुरक्षित राहण्याचा उत्तम मार्ग आहे.
वायरलेस इंटरनेट, कॉम्प्युटर नेटवर्क्‍स आणि हॉट-स्पॉट्स तसेच वायरलेस माउस, की-बोर्ड्स व स्पीकर्सदेखील मोबाईल फोनद्वारे वापरात येत असलेल्या नॉन-आयोनाईझिंग रेडिएशन फ्रिक्वेन्सीमुळे संचलित होतात.

वायरलेस तंत्रज्ञानाच्या उपकरणांपासून उत्सर्जित होणा-या निन्म-पातळीच्या विद्युतचुंबकीय तरंगामुळे आरोग्य व प्रजननक्षमतेवर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सेल्युलर हानी आणि कर्करोगाचा धोका वाढतो. मांडीवर लॅपटॉॅप ठेवून पुष्कळ वेळ काम केल्यानेदेखील शुक्राणूंची गुणवत्ता व संख्या प्रभावित होतात. लॅपटॉॅपमुळे निर्माण होणा-या उष्णतेमुळे असे होते. अंडकोश हे उष्णतेसाठी ओव्हरीझपेक्षा जास्त भेद्य असतात म्हणून स्त्रियांवर अशा प्रकारे परिणाम सहसा होत नाही. जे स्त्रियांच्या शरीरात असलेल्या, अंडाशयांमध्ये अंडी निर्माण होतात, लॅपटॉपमधून निर्माण होणारी उष्णता इतकी तीव्र नसते की ती संपूर्ण शरीराचे तापमान इतके वाढवेल की त्यामुळे ओव्हरीजना हानी पोहोचून अंडी-उत्पादनास इजा होईल.

वंध्यत्वाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी, सावध निवड आणि तंत्रज्ञानाचा योग्य व विचारपूर्ण वापर करणे महत्त्वाचे आहे. फोन खिशामध्ये न ठेवणे, गरोदर असताना फोन पोटापासून दूर ठेवणे, अति बोलण्यापेक्षा टेक्स्टिंगचा जास्त वापर करणे हे जीवनशैलीतील असे काही सोपे बदल आहेत ज्यांमुळे एका आरोग्यसंपन्न जीवनाची खात्री हमखास मिळते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe